बिहार विधानसभा निवडणूक: मतदार यादीतील नावांसाठी आधार कार्ड आता वैध

नवी दिल्ली: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावृत्ती (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेसाठी आता आधार कार्डलाही वैध ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला मोठा धक्का बसला आहे. याआधी निवडणूक आयोगाने आधार कार्डला या प्रक्रियेतून वगळले होते, ज्याला ‘इंडिया’ आघाडीने विरोध दर्शवला होता.


निवडणूक आयोगाने बिहारमध्ये १ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती, ज्यातून सुमारे ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. ही नावे मृत किंवा दोन ठिकाणी नोंदणीकृत असलेल्या मतदारांची असल्याचे आयोगाने सांगितले होते. या प्रक्रियेत मतदारांची पडताळणी करण्यासाठी पॅन कार्ड, गुणपत्रिका यांसारखी ११ कागदपत्रे ग्राह्य धरली जात होती. मात्र, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र या यादीतून वगळल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.



यावर, अधिवक्ता बरुण सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचा स्थिती अहवाल सादर केला. न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या ‘बीएलओ’ (BLO - Booth Level Officer) यांना निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून मतदार यादीचे पुनरावलोकन लवकरात लवकर पूर्ण होईल.


नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ वैध मतदारच मतदान करू शकतील यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता आधार कार्डचा वापर करून मतदार यादीतील नावे पुन्हा तपासणे सोपे होईल, असे मानले जात आहे.

Comments
Add Comment

PM Modi Malaysia Visit : पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यामुळे भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणाला मिळणार बळकटी

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार