बिहार विधानसभा निवडणूक: मतदार यादीतील नावांसाठी आधार कार्ड आता वैध

नवी दिल्ली: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावृत्ती (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेसाठी आता आधार कार्डलाही वैध ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला मोठा धक्का बसला आहे. याआधी निवडणूक आयोगाने आधार कार्डला या प्रक्रियेतून वगळले होते, ज्याला ‘इंडिया’ आघाडीने विरोध दर्शवला होता.


निवडणूक आयोगाने बिहारमध्ये १ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती, ज्यातून सुमारे ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. ही नावे मृत किंवा दोन ठिकाणी नोंदणीकृत असलेल्या मतदारांची असल्याचे आयोगाने सांगितले होते. या प्रक्रियेत मतदारांची पडताळणी करण्यासाठी पॅन कार्ड, गुणपत्रिका यांसारखी ११ कागदपत्रे ग्राह्य धरली जात होती. मात्र, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र या यादीतून वगळल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.



यावर, अधिवक्ता बरुण सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचा स्थिती अहवाल सादर केला. न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या ‘बीएलओ’ (BLO - Booth Level Officer) यांना निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून मतदार यादीचे पुनरावलोकन लवकरात लवकर पूर्ण होईल.


नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ वैध मतदारच मतदान करू शकतील यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता आधार कार्डचा वापर करून मतदार यादीतील नावे पुन्हा तपासणे सोपे होईल, असे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर