Cyber Fraud: ६० कोटींची सायबर फसवणूक! ९४३ बँक खात्यांचा वापर, १२ आरोपींना ठोकल्या बेड्या

देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक घटना 


मुंबई: मुंबई पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमध्ये एका जोडप्यासह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यासाठी संबंधित आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून देशभरातील अनेक लोकांची फसवणूक केली आहे. ज्यामध्ये तब्बल  ६०.८२ कोटी रुपये लांपास केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून ही फसवणूक केली. सदर कारस्थानासाठी संबंधित आरोपींनी तब्बल ९४३ बँक खात्याचा वापर केल्याची माहिती सूत्रकडून मिळाली आहे. , त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरण्यात आली आहे. ही टोळी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीत  बिलंदर होती.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑगस्ट रोजी कांदिवली परिसरात छापा टाकला आणि पाच आरोपींना अटक केली. तपासात असे दिसून आले की या टोळीने आतापर्यंत ९४३ बँक खाती खरेदी केली आहेत, त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरली गेली. आरोपी ७ ते ८ हजार रुपयांना बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करायचे आणि नंतर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शॉपिंग आणि शेअर ट्रेडिंग फसवणूक यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा वापर करत असत.



महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक


या फसवणूकीच्या मुद्द्यावर बोलताना, मुंबई पोलिसांचे उपायुक्त राज तिलक रोशन म्हणाले की, ही टोळी गेल्या वर्षापासून देशभरातील लोकांना फसवण्यासाठी सक्रिय होती. आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर मुंबई शहरातच त्यांनी १.६७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांची फसवणूक करत हडप करण्यात आली.



१२ सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक


पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की टोळीतील काही आरोपी त्यांचे बँक खाती आणि सिम कार्ड विकून प्रचंड पैसे कमवत होते. टोळीचे नेते त्यांचा ऑनलाइन फसवणुकीत वापर करत होते. आतापर्यंत पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे आणि अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की हे देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक आहे आणि या नेटवर्कशी संबंधित आणखी लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता