Cyber Fraud: ६० कोटींची सायबर फसवणूक! ९४३ बँक खात्यांचा वापर, १२ आरोपींना ठोकल्या बेड्या

देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक घटना 


मुंबई: मुंबई पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमध्ये एका जोडप्यासह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यासाठी संबंधित आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून देशभरातील अनेक लोकांची फसवणूक केली आहे. ज्यामध्ये तब्बल  ६०.८२ कोटी रुपये लांपास केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून ही फसवणूक केली. सदर कारस्थानासाठी संबंधित आरोपींनी तब्बल ९४३ बँक खात्याचा वापर केल्याची माहिती सूत्रकडून मिळाली आहे. , त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरण्यात आली आहे. ही टोळी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीत  बिलंदर होती.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑगस्ट रोजी कांदिवली परिसरात छापा टाकला आणि पाच आरोपींना अटक केली. तपासात असे दिसून आले की या टोळीने आतापर्यंत ९४३ बँक खाती खरेदी केली आहेत, त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरली गेली. आरोपी ७ ते ८ हजार रुपयांना बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करायचे आणि नंतर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शॉपिंग आणि शेअर ट्रेडिंग फसवणूक यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा वापर करत असत.



महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक


या फसवणूकीच्या मुद्द्यावर बोलताना, मुंबई पोलिसांचे उपायुक्त राज तिलक रोशन म्हणाले की, ही टोळी गेल्या वर्षापासून देशभरातील लोकांना फसवण्यासाठी सक्रिय होती. आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर मुंबई शहरातच त्यांनी १.६७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांची फसवणूक करत हडप करण्यात आली.



१२ सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक


पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की टोळीतील काही आरोपी त्यांचे बँक खाती आणि सिम कार्ड विकून प्रचंड पैसे कमवत होते. टोळीचे नेते त्यांचा ऑनलाइन फसवणुकीत वापर करत होते. आतापर्यंत पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे आणि अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की हे देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक आहे आणि या नेटवर्कशी संबंधित आणखी लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.

Comments
Add Comment

Watermelon Case : कलिंगड खाऊन मृत्यू की प्लॅन केलेला कट? पायधुनीतील 'त्या' ४ मृत्यूंमागे ७ वर्ष जुनं रहस्य!

मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरातील घाटी गल्लीत एका घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथील 'मुघल

Watercut In Mumbai : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे आणि तुर्भेपर्यंतचा जलबोगदा होणार सुरु

येत्या ५ ते ६ मे रोजी ३० तासांची जोडणी कामांसाठी पाणीकपात मुंबई : अमर महल ते वडाळा, परळ तसेच ट्रॉम्बे व तुर्भे

1 May Maharashtra Day : १ मे : दादर-शिवाजी पार्क परिसराच्या वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पर्यायी मार्ग!

मुंबई : उद्या, शुक्रवार १ मे रोजी 'महाराष्ट्र दिनानिमित्त' दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज्य

मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे.

Bacchu Kadu, Nilam Gorhe : अखेर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार झाले जाहीर; शिवसेनेच्या या नेत्यांना मिळणार उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीसाठी बच्चू कडू यांचा पक्ष

BMC News : विरोधकांचा होता निर्धार पक्का, सत्ताधाऱ्यांना बसला धक्का

-वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी विरोधकांनी हाणून पाडली मुंबई (विशेष