पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा


मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला मिळाला आहे. नागपूरच्या या बंगल्यात मी लोकांच्या तक्रारी, कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी खास स्टाफ नेमला आहे. त्या स्टाफने मला सांगितले आहे की, या कार्यालयात जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी येतच नाहीत. जे येतात त्यांच्या तक्रारी आम्ही ऐकून घेतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


जे तक्रारी घेऊन माझ्या बंगल्यातील कार्यालयात येतात, त्यांना माझा स्टाफ संबंधित कार्यालयात घेऊन जातो आणि तक्रार सोडवण्याचा प्रयत्न करतो. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवली पाहिजे. नाहीतर आमच्या आणि पक्षाच्या नावावर कोणी पदाधिकारी आपली दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे, असे अजित पवार म्हणाले.


सर्व तक्रारी १०० टक्के सोडवता येत नाहीत. माझ्या स्वभाव असा आहे, की जे न होणारे काम असतात त्याबद्दल मी लगेच सांगून देतो. विदर्भातील पदाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही मला कामाची यादी द्या. मी अधिकाऱ्यांना ती यादी देतो आणि सांगतो की यादीतील नावे असलेले कार्यकर्ते काम घेऊन आले तर ते काम अजित पवाराने सांगितले आहे असे समजून कार्यकर्त्यांचे काम करा, असे ते यावेळी म्हणाले.


सार्वजनिक हिताच्या कामाला प्राधान्य : तुम्ही काम केले म्हणून लोक मते देतात, हे समीकरण डोक्यातून काढून द्या. कोणत्या कामाला महत्त्व देतात हे लोक पाहत असतात. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षात होती. तरी त्यांच्या ३१ जागा निवडून आल्या आणि आम्ही सत्तेत होतो तरी आमच्या १७ जागा निवडून आल्याचे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांना सांगितलेला काम नियमात बसणारे असले पाहिजे. नियमाच्या बाहेरचे काम अधिकाऱ्यांवर दबाव आणला तरी तो कसे करणार? अधिकाऱ्याला सांगायचे काम तुमचे वैयक्तिक नसावे, तो सार्वजनिक हिताचे काम असावे असे अजित पवार म्हणाले.

Comments
Add Comment

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही