राज्यात आजपासून काही भागात पावसाचा जोर ओसरणार

काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज गुरुवारी काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, राज्यात काही भागात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात जनजीवन विस्कळित झाले. राज्यातील बहुतांश भागात मात्र, बुधवारी पावसाचा जोर कमी होता. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी पाऊस ओसरला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.


त्यानुसार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. प्रामुख्याने कोकणात अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल. मात्र, इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर तसेच उपनगरात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला, पहाटेही पावसाचा जोर कायम होता.


सकाळी ११ नंतर पावसाने विश्रांती घेतली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ०.४ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९.८ मिमी पावसाची नोंद झाली.


राज्यात बुधवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत झालेला पाऊस


पुणे – १.८ मिमी


माथेरान – २९.४ मिमी


नाशिक – २२.२ मिमी


कोल्हापूर – ४.३ मिमी


धाराशिव – ४.२ मिमी


डहाणू – २७.२ मिमी


रत्नागिरी – ७.३ मिमी


मालेगाव – १९.३ मिमी


पावसाचा अंदाज कुठे


मुसळधार पाऊस – मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड
हलक्या सरी – सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली,परभणी, बीड, हिंगोली, नांदेड यवतमाळ, चंद्रपूर, लातूर

Comments
Add Comment

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी