विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात सुरु असून आज बुधवारी देखील पाऊस सुरु आहे. सकाळी रेल्वे सेवा विरार ते अअंधेरी विस्कळीत झाली होती मात्र पुन्हा दुपारी १२ वाजल्यापासून सुरळीत सुरु झाली आहे.

वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग १२ तासापासून पाण्याखाली आहे. तेथील विद्युत सप्लाय बंद असल्याने नागरीकांचे हाल बेहाल झाले आहेत. काल वसई विरार क्षेत्रात पावसाचं रौद्ररुप पाहायला मिळालं. संपूर्ण वसई विरार जलमय झालं होतं. अनेख सखल भागातील सोसायटीमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मिटर बॉक्स पर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. माञ अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने लाईट नाही आहे.

जवळपास १२ तासापासून काही ठिकाणी लाईट नाही आहे. विरार येथील गोकुळ टाउनशिप, छेडा नगर, स्टेशन परिसर वसईतील स्टेशन परिसर तसेच माणिकपूर मधील काही भाग, नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसर, पश्चिमेतील श्रीप्रस्थ रोड, या ठिकाणी काल दुपारी ३ वाजल्यापासून वीज बंद करण्यात आली आहे. राञभर कोसळलेल्या पावसामुळे आताही सोसायटीमध्ये पाणी साचल्याने पाणी ओसरल्यावर तात्काळ वीज प्रवाह सुरु करण्यात येईल अशी माहीती महावितरणाचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली आहे.

वसई-विरार : गेल्या चार दिवसांपासून वसई-विरार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड, आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठे मासे दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक

BJP : भाजपकडून २३ प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई : पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)