रत्नागिरी : कशेडी घाटात रस्ता खचला, दरड कोसळल्याने प्रवास धोकादायक

  32

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत पुन्हा एकदा रस्ता खोल खचला असून त्यावर दरडही कोसळली आहे. २००५ सालापासून या भागात रस्ता खचण्याचे आणि दरड कोसळण्याचे प्रमाण कायम असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतिवृष्टीमुळे या ठिकाणी वारंवार रस्ता खचत असल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी तात्पुरत्या दुरुस्तीचे काम झाले तरी मूळ प्रश्न कायम आहे. गेल्या जुलै महिन्यात तहसीलदारांनी पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ मलमपट्टी झाल्याने स्थिती जैसे थेच आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता आणखी खोल खचला असून मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे. स्थानिक नागरिकांचा प्रश्न कायम आहे की प्रशासन एखाद्या जीवितहानीची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे

सन 2005 पासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होतात, अनेक खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांनी या ठिकाणी भेट देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तरीही २० वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. गौरी-गणपतीसारखे मोठे सण जवळ आल्याने या भागातील 26 गावांतील लोक चिंतेत आहेत. प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Comments
Add Comment

बारावीच्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटवले

भोपाळ: एकतर्फी प्रेमातून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या २६ वर्षीय शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून

कल्याणमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी: ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेत आज मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना (शिंदे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभेत सादर झालेली ३ विधेयके काही मिनिटांत संयुक्त संसदीय समितीकडे

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बुधवार २० ऑगस्ट रोजी तीन महत्त्वाची विधेयके सादर केली. ही

आळंदीत इंद्रायणीला पूर, जुना पूल आणि घाटावर जाण्यास बंदी

आळंदी : मुसळधार पावसामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. मंदिराच्या दिशेने

Jalgoan News : शेतात कामाला गेले अन् ५ जीव परतलेच नाहीत, एरंडोल तालुक्यातील भीषण घटना”, काय घडलं नेमकं?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गाव हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गावाजवळील शेतात एकाच

Best Cooprative Bank Election : मुंबईकरांचा कौल ठाम! "मुंबईत ड्युप्लिकेट ब्रँडला नाही थारा", बेस्टच्या रणांगणात भाजपाचा दावा

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव