Mumbai Rains: मुंबईत आजही पावसाने आकाशात काळे ढग, मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई: मुंबईसह राज्यभरात सोमवारपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे काही नावच घेत नाही. मंगळवारी मुंबईची अक्षऱश: तुंबई झाली होती. सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. लोकल वाहतूक ठप्प झाली. मोनोरेलमध्येच अडकली. अनेक प्रवाशांचे मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत.


त्यातच बुधवारीही पावसाने आकाशात काळे ढग जमा झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. अजूनही लोकल वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. रात्रीपर्यंत ही वाहतूक विस्कळीतच होती.


मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाने थोडीफार विश्रांती घेतली होती. मात्र पहाटेपासून पुन्हा पावसाच्या ढगांनी आकाशात गर्दी केली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता आहे.


हवामान खात्याने बुधवारीही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो असे हवामान खात्याने सांगितले आहे.



कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली


कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून विसर्ग सुरू


बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या धरणांपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मोडकसागरमधून २५१११ क्युसेक, तर तानसा धरणातून ३८६८४.१० क्युसेक आणि मध्य वैतरणा येथून १४८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.



तळकोकणात पावसाचा धुमाकूळ


सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोरदार मारा पाहायला मिळत आहे. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढल्याने ३ ते ३.५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Sudhir Mungantiwar : आधी घरचा आहेर, मग 'वर्षा'वर खलबतं! मुनगंटीवार-फडणवीस भेटीत नेमकं काय शिजलं?

चंद्रपूरच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचे 'बंड' की समन्वय? मुंबई : राज्यात महायुतीचा विजयाचा वारू उधळत असताना

गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध

राज्यातील ३० लाख लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'कडे पाठ

३१ डिसेंबरची डेडलाईन; प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ कायमचा बंद मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

भारताने अल्प किंवा दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावे: तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान

मुंबई : दहशतवाद रोखण्यासाठी आणि शेजारी राष्ट्रांबरोबर असलेल्या प्रादेशिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने उच्च

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी