ऐन पावसात अ‍ॅप बेस्ड कॅब सेवांनी केली प्रवाशांची लूट


मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती. ठिकठिकाणी बेस्टच्या बस पाण्यात अडकल्या होत्या. या परिस्थितीत काही नागरिकांनी प्रवासाचा सुरक्षित पर्याय म्हणून अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण या गरजू प्रवाशांना कंपन्यांनी लुबाडल्याची बाब समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत हजारो रुपयांचे भाडे अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आकारले होते. कल्याण ते सीएसएमटी / चर्चगेटसाठी २,४०० रुपये आणि सीएसएमटी ते ठाणेसाठी १,५०० रुपयांची आकारण्याचे प्रकार घडले. यामुळे पावसाने त्रासलेल्या नागरिकांना सुरक्षित प्रवासाकरिता खिसा रिकामा करण्याची वेळ आली होती.


मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे अनेक वाहने अडकली होतो. अंधेरी, कुर्ला घाटकोपर रोड मरोळ नाका, बीपीटी रोडवरील कॉटन फाटक परिसरात दोन फूट पाणी साचले होते. पेडर रोड, महालक्ष्मी मंदिर आणि ताडदेव परीसरात दिड फूट पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतूक बंद होती. रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती त्यामुळे अनेकांनी लांबच्या प्रवासाकरिता अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण परिस्थितीचा गैरफायदा घेत कॅबवाल्याने थेट दिड ते अडीच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले.


एरव्ही बक्कळ नफा कमवणाऱ्या ॲप आधारित कॅब सेवांनी किमान नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ना नफा ना तोटा दरात सेवा द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. वाजवी दरापेक्षा अधिक पैसे आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर सरकारनेच नियमावली करुन कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली.


Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र