Monsoon News : अरबी समुद्रात चक्राकार वारे, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला वेग; १ जुलैपासून मान्सून पूर्ण सक्रिय होणार

मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरुवातीला दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून रखडल्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. ६ जून रोजी तळकोकणात आगमन झाल्यानंतर ८ जूनपासून मान्सून दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे एकाच जागी स्थिर आहे. अनुकूल हवामान प्रणाली अभावी मान्सूनचा प्रवास मंदावला असून राज्यात जून महिन्याच्या सरासरीच्या केवळ २२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात तब्बल ७८ टक्के पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. मात्र, आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीला गती देणारी हवामान प्रणाली सक्रिय होत आहे. २३-२४ जूनपासून परिस्थिती अनुकूल होऊन २५ जूननंतर पावसाचा जोर वाढेल आणि १ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासून मुंबईसह उपनगराच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील पूर्वेकडील व ईशान्येकडील वारे आणि अरबी समुद्रातील उत्तरेकडील वाऱ्यांमधील तफावत, गुजरात ते ओडिशा दरम्यान निर्माण झालेला उच्च दाबाचा पट्टा, तसेच हिमालयाच्या पश्चिम भागातील चक्रवाताचा प्रभाव यामुळे मॉन्सूनची प्रगती मंदावली आहे. याशिवाय, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाला असून जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. महासागर आणि वातावरणातील ही स्थिती भारतीय मॉन्सूनसाठी प्रतिकूल मानली जात असल्याने, यंदाच्या हंगामात पावसाचे असमान वितरण आणि काही भागांत पावसाची कमतरता राहू शकते.



२५ जूननंतर हवामानात बदल
२५ जून ते १ जुलै या कालावधीत सोमालिया किनारपट्टीकडून भारताच्या दिशेने बाष्प घेऊन येणारे वारे मजबूत होणार आहेत. मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असल्याने मध्य आणि दक्षिण भारतात पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढेल. यामुळे कोकण किनारपट्टीसह राज्यातील बहुतांश भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.


'यलो अलर्ट' (वादळी पाऊस): सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट भागात आज वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
हलक्या सरींचा अंदाज: मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, पुणे आणि पुणे घाट, सातारा आणि सातारा घाट, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड.
विदर्भाची स्थिती: विदर्भातील बहुतांश भागात आज उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती राहण्याचा अंदाज असून, काही भागांत वादळी पावसाचीही शक्यता आहे.



पावसाची सद्यस्थिती
धुळे, नंदूरबार आणि ठाणे: १००% तूट
धाराशिव: ३८% तूट
सांगली: ४९% तूट
सोलापूर: ४७% तूट
लातूर: ४१% तूट.
बीड आणि चंद्रपूर: ५४% तूट
नागपूर: ५१% तूट.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत ६० ते ९९ टक्के कमी पाऊस झाला आहे.

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे