पुढील ३ तास धोक्याचे! मुंबईकरांना सतर्क राहण्याचे थेट मंत्रालयातून आदेश

मुंबई: पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याद्वारे देण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे मंत्रालयातून आवाहन करण्यात आले आहे.


मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज दुपारी २ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत समुद्राला भरती असल्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या दरम्यान मुंबईत आणखीन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, यामुळे मुंबईच्या सखल भागात आणखीन पाणी साचू शकते. त्यामुळे मुंबईत काही तास पुरपरिस्थितीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे, समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे, तसेच नदी-नाल्यांच्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटद्वारे राज्यातील पावसाचा आढावा घेत ट्विट केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की,  "मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत सरासरी १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची ३.९ मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून ३५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत."



ठाण्यात दरड कोसळली, एक जखमी


ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील संतोष पाटील नगर येथे असलेल्या घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.



मुंबईची जीवनवाहिनी ठप्प


मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक देखील काही कालावधीसाठी ठप्प झाली आहे.


मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे, ज्याचा चांगलाच फटका ग्रामीण आणि शहरी भागाला बसला आहे. मुंबई, कोकण,  पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिकपासून ते मराठवाडा आणि विदर्भापर्यंत पावसाने सर्वत्रच हाहाकार माजवला आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी अनेक भागात रेड अलर्ट जारी केलाय, तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्टही जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्रात आतापर्यंत ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पाच जण वाहून गेले आहेत. आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याचे सांगण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा