ठाणेसह ५ जिल्ह्यातील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर, प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश

मुंबई: राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच कोसळत आहे. हवामान विभागाने २० ऑगस्टलाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सातारा या ५ जिल्ह्यातील शाळांना बुधवारी २० ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


अतिवृष्टीची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या राज्यांमधील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात आज पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. नेहमी चालत राहणाऱ्या मुंबईचा वेग या पावसामुळे मंदावला. मुंबईतील वाहतुकीचे तर तीन तेरा वाजले होते.


ठाणे जिल्ह्यासह रत्नागिरी तसेच पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच कोकण भागातही पावसाची दमदार हजेरी आहे. खेडमध्ये जगबुडी नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.



रत्नागिरीतील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे २० ऑगस्टलाही सुटी


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे बुधवारी २० ऑगस्टलाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.


जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असून, १७-१८ ऑगस्टला हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला होता. आज, १९ ऑगस्टलाही दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. खेड, राजापूर, चिपळूणसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्याही (दि. २० ऑगस्ट) सुटी जाहीर करण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मान्यतेने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे आजही (१९ ऑगस्ट) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.


Comments
Add Comment

उद्धव गटाने दसरा मेळावा सोनिया गांधींच्या अंगणात घ्यावा

मुंबई: त्यांचे हाय कमांड दिल्लीत बसतात आणि त्यांच्याकडे विमान भरण्याइतकेही समर्थक नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागली

परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान नवी मुंबई : दसरा सणासाठी झेंडू, आंब्याच्या डहाळ्या,

शेतकरी खचून गेलेत, पण सरकार त्यांच्या पाठीशी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार

पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचे आश्वासन मुंबई: मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह सोलापूरमध्ये

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

कर्करोग उपचारांसाठी सर्वसमावेशक धोरण; जागतिक क्षमता केंद्रांना प्रोत्साहन आणि सौर कृषीपंपांसाठी अतिरिक्त

Mumbai Local Train New Stations : लोकल प्रवाशांना हटके गिफ्ट! विरार-डहाणू मार्गावर ७ नवी स्थानके; 'या' ठिकाणी उभारणीला सुरुवात, संपूर्ण यादी पहाच

मुंबई : मुंबईच्या लाखो प्रवाशांसाठी 'लाइफलाइन' ठरलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील

कोस्टल रोडवर ANPR कॅमे-याची कमाल; १३२ किमी वेगाचा विक्रम, रोज ४६५ नियमभंग! जाणून घ्या पूर्ण बातमी

मुंबई : मुंबईच्या ‘हाय-स्पीड’ कोस्टल रोडवर सुरूवातीपासूनच वाहनचालकांचा वेगावर ताबा सुटल्याचं चित्र समोर आलं