ठाणेसह ५ जिल्ह्यातील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर, प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश

मुंबई: राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच कोसळत आहे. हवामान विभागाने २० ऑगस्टलाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सातारा या ५ जिल्ह्यातील शाळांना बुधवारी २० ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


अतिवृष्टीची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या राज्यांमधील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात आज पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. नेहमी चालत राहणाऱ्या मुंबईचा वेग या पावसामुळे मंदावला. मुंबईतील वाहतुकीचे तर तीन तेरा वाजले होते.


ठाणे जिल्ह्यासह रत्नागिरी तसेच पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच कोकण भागातही पावसाची दमदार हजेरी आहे. खेडमध्ये जगबुडी नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.



रत्नागिरीतील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे २० ऑगस्टलाही सुटी


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टीमुळे बुधवारी २० ऑगस्टलाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.


जिल्ह्यात तीन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असून, १७-१८ ऑगस्टला हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला होता. आज, १९ ऑगस्टलाही दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. खेड, राजापूर, चिपळूणसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्याही (दि. २० ऑगस्ट) सुटी जाहीर करण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मान्यतेने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे आजही (१९ ऑगस्ट) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.


Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता