मध्य रेल्वे ठप्प, सायन, कुर्ला आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याखाली


मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये नागरिकांच्या कमरेइतकं पाणी भरल्याने चालताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील टप्प झाली आहे. सायन, कुर्ला आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे या भागात लोकल सेवेत खोळंबा दिसून येतो आहे.


मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रचंड पाऊस आणि भरती सुरू असल्यामुळे महानगरपालिकेने फ्लड गेट्स उघडले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी मुंबईत शिरण्यापासून रोखले जात आहे. सध्या हे फ्लड गेट बंद करण्यात आले आहेत. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर यासह मिठी नदीच्या जवळ असलेल्या परिसरांमध्ये पाणी साचले आहे. दादरसारख्या स्टेशनमध्येही पाणी भरल्याने लोकल सेवेला प्रत्यक्ष फटका बसला आहे.


सध्या सायन आणि दादर दरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत, पण पाण्याची पातळी ओसरल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर पाणी सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेच्या काही ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे आणि प्रवाशांना अद्याप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


Comments
Add Comment

Borivali-Gorai Jetty : बोरिवली-गोराई आता फक्त १५ मिनिटांत! तासनतासांच्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका; रो-रो जेट्टीचं काम सुरू

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई

Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू

Akshay Kumar Car Accident : अक्षय कुमारच्या डोळ्यासमोर सुरक्षा ताफ्याचा भीषण अपघात; मर्सिडीजने रिक्षेला चिरडले, जुहू परिसरात मध्यरात्री खळबळ

मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा सोमवारी रात्री जुहू परिसरात भीषण

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक