मध्य रेल्वे ठप्प, सायन, कुर्ला आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

  36


मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये नागरिकांच्या कमरेइतकं पाणी भरल्याने चालताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा देखील टप्प झाली आहे. सायन, कुर्ला आणि दादर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे या भागात लोकल सेवेत खोळंबा दिसून येतो आहे.


मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रचंड पाऊस आणि भरती सुरू असल्यामुळे महानगरपालिकेने फ्लड गेट्स उघडले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी मुंबईत शिरण्यापासून रोखले जात आहे. सध्या हे फ्लड गेट बंद करण्यात आले आहेत. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर यासह मिठी नदीच्या जवळ असलेल्या परिसरांमध्ये पाणी साचले आहे. दादरसारख्या स्टेशनमध्येही पाणी भरल्याने लोकल सेवेला प्रत्यक्ष फटका बसला आहे.


सध्या सायन आणि दादर दरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत, पण पाण्याची पातळी ओसरल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर पाणी सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेच्या काही ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे आणि प्रवाशांना अद्याप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


Comments
Add Comment

गोरेगाव ओबेरॉय मॉल परिसरात साचले पाणी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली मुंबई: सलग दोन दिवस पडत असलेल्या

Devendra Fadanvis : मुंबईत भरतीच्या वेळी पाऊस पडला तर, धोका वाढेल...मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २८ हजारांहून अधिक रोजगार निर्मिती

मुंबई : महाराष्ट्र आता ‘डेटा सेंटर कॅपिटल’ आणि ‘सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल’ म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या

Mumbai Filterpada Powai : पाय घसरला आणि थेट नाल्याच्या प्रवाहात; फिल्टरपाड्यातील युवकाचा जीवघेणा प्रसंग

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केली आहे. अशातच पवईतील फिल्टर पाडा

पुढील ३ तास धोक्याचे! मुंबईकरांना सतर्क राहण्याचे थेट मंत्रालयातून आदेश

मुंबई: पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला पावसाचा आढावा; "२४ तासांत ३०० मिमी पाऊस, मिठी नदीला पूर, अन् शेकडो..."

मुंबई : राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला असून, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती