मुलुंडकरांनो गुरुवारी पाणी जपून वापरा, १८ तास पाणीबाणी

मुंबई : मुलुंडमधील काही भागांत गुरुवार २१ ऑगस्ट रोजी १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. एक जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे टी वॉर्ड या मुलुंड वॉर्डमध्ये ‘मॅरेथॉन मॅक्सिमा’ इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार आहे. ही जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट २०२५ ला सकाळी १० वाजल्यापासून ते २२ ऑगस्टला पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागाचा पाणीपुरवठा अठरा तास बंद राहणार आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता आणि लगतचा परिसर, मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, जवाहरलाल नेहरू मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस.एन.मार्ग, आर.एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी.मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल.मार्ग, नाहुर गाव या भागात पाणीपुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी साठवून आणि जपून वापरावे तसेच नवीन पाइपलाइनमधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर किमान ५ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र