मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळपासून मुंबईसह, मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची आज सोमवारी सकाळपर्यंत संततधार सुरु आहे. तसंच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामन खात्याने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहण्याची, रस्ते वसाहती जलमय होण्याची, वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, तर हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिरा धावत आहे. आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय.

यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा केला असला तरी अचानक मुसळधार पावसाचा फटका बसल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, किनाऱ्यावर व नदीनाल्यांच्या काठावर जाणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. १८ ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाट परिसर, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढल्यास काही भागांत तालुक्यातील नद्यांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.

मुंबईत कुठे किती पाऊस? (पहाटे५.३० पर्यंतच्या २४ तासांत)
- टाटा पॉवर चेंबूर ८१.५ मिमी
- सांताक्रूझ ७० मिमी
- विक्रोळी ६९ मिमी
- सायन ६७ मिमी
- जुहू ५८ मिमी
- भायखळा ५८ मिमी
- बांद्रा ५४ मिमी
- कुलाबा २२ मिमी

मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे. किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे.
Comments
Add Comment

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण