मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळपासून मुंबईसह, मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे.

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची आज सोमवारी सकाळपर्यंत संततधार सुरु आहे. तसंच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामन खात्याने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहण्याची, रस्ते वसाहती जलमय होण्याची, वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, तर हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिरा धावत आहे. आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय.

यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा केला असला तरी अचानक मुसळधार पावसाचा फटका बसल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, किनाऱ्यावर व नदीनाल्यांच्या काठावर जाणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. १८ ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाट परिसर, मराठवाडा, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढल्यास काही भागांत तालुक्यातील नद्यांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.

मुंबईत कुठे किती पाऊस? (पहाटे५.३० पर्यंतच्या २४ तासांत)
- टाटा पॉवर चेंबूर ८१.५ मिमी
- सांताक्रूझ ७० मिमी
- विक्रोळी ६९ मिमी
- सायन ६७ मिमी
- जुहू ५८ मिमी
- भायखळा ५८ मिमी
- बांद्रा ५४ मिमी
- कुलाबा २२ मिमी

मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे. किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे.
Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले