दापोलीत ५.४५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कस्टम विभागाने गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर ४ किलो १४० ग्रॅम वजनाची दुर्मीळ व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंबरग्रीसची किंमत ५.४५ कोटी रुपये इतकी असल्याचे कस्टम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

कस्टम विभागाला गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ, पांढऱ्या समुद्रकिनारी एका हलक्या तपकिरी रंगाचा आणि अत्यंत चिकट जेलीसारखा गोळा असल्याची माहिती मिळाली होती. सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल व्ही. पोतदार आणि अधीक्षक विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

कस्टम विभागाच्या या जलद कारवाईमुळे ४ किलो १४० ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आले. औषधनिर्मितीमध्ये या अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा हुकला

मनसेचं 'वैभव' भाजपला केव्हा फळणार? मुंबई : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी मराठीत म्हण आहे. वैभव खेडेकर यांच्या

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य