दापोलीत ५.४५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कस्टम विभागाने गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर ४ किलो १४० ग्रॅम वजनाची दुर्मीळ व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंबरग्रीसची किंमत ५.४५ कोटी रुपये इतकी असल्याचे कस्टम विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

कस्टम विभागाला गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ, पांढऱ्या समुद्रकिनारी एका हलक्या तपकिरी रंगाचा आणि अत्यंत चिकट जेलीसारखा गोळा असल्याची माहिती मिळाली होती. सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल व्ही. पोतदार आणि अधीक्षक विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

कस्टम विभागाच्या या जलद कारवाईमुळे ४ किलो १४० ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आले. औषधनिर्मितीमध्ये या अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे त्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर टोल प्लाझाजवळ कार आणि ट्रकची टक्कर रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील

गणेश विसर्जनानिमित्ताने उद्यापासून रत्नागिरीत वाहतुकीच्या मार्गात बदल

रत्नागिरी:  गणेश विसर्जना निमित्ताने दिनांक २, ४, ६ आणि ७ सप्टेंबरला रत्नागिरी शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ, तरुणाला भोवली अतिघाई

रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण