दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. रास्ता वाहून गेल्याने कुंभारवाडी आणि काही वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. याच मार्गाने नळपाणी योजनेकडे जाण्याची सोय असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे.

हा रस्ता वाकवली–असोंड–उन्हावरे मेन रोडला जोडणारा असून कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन वर्षांपूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यावेळीच मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. तसेच मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही लेखी पत्राद्वारे मागणी पोहोचविण्यात आली होती. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने ही आपत्ती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याठिकाणी जाऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपासरपंच, तसेच सदस्य व गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली आहे.याबाबत ज़िल्हापरिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सदरचा रस्ता हा असोंड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असून याघटनेची माहिती घेतली जाईल व सध्या स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपयोजना करून दिल्या जातील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या