दापोली : मुसळधार पाऊस, खेड-दापोली रस्ता बंद, असोंडमध्ये रस्ता वाहून गेला

दापोली तालुक्यातील वाकवली–उन्हावरे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. रास्ता वाहून गेल्याने कुंभारवाडी आणि काही वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. याच मार्गाने नळपाणी योजनेकडे जाण्याची सोय असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे.

हा रस्ता वाकवली–असोंड–उन्हावरे मेन रोडला जोडणारा असून कायमच वाहतुकीने गजबजलेला असतो. दोन वर्षांपूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यावेळीच मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. तसेच मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही लेखी पत्राद्वारे मागणी पोहोचविण्यात आली होती. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने ही आपत्ती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याठिकाणी जाऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपासरपंच, तसेच सदस्य व गावातील ग्रामस्थांनी पाहणी केली आहे.याबाबत ज़िल्हापरिषद दापोली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले की, सदरचा रस्ता हा असोंड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असून याघटनेची माहिती घेतली जाईल व सध्या स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपयोजना करून दिल्या जातील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले