मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर


मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये कचरा उचलण्यासाठी छोट्या कॉम्पॅक्टर वाहनांची वाहतूक करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता महापालिकेच्यावतीने आता ई गाडीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयाच्यावतीने वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागातील अरुंदी गल्लीतील कचरा उचलण्यासाठी विशेष ई कचरा गाडीचा प्रयोग केला असून १५ ऑगस्ट दिनी प्रायोगिक तत्त्वावर याचा प्रारंभ करण्यात आला आहे.


एच/पूर्व विभागातील अरुंद झोपडपट्टीतील गल्लींमध्ये कचरा संकलनातील अडचणी दूर करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रयत्न केला जात असून यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-गाडीचा प्रारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ई गाडीचा प्रयोग करण्यात येत असून अंडे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करून प्रायोगिक तत्वावर याचा वापर सुरू करण्यात आला आहे.


या ई गाडीचा वापर करण्याची ही संकल्पना कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवून विभागाचा स्वच्छ व हिरवागार परिसर या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यास मदत करेल,असा विश्वास मृदुला अंडे यांनी व्यक्त केला.


वाहनाची रुंदी ३२ इंच-अशा अरुंद गल्लींमध्ये सहज प्रवेश, जिथे लहान बंदिस्त कचरा गाड्या पोहोचू शकत नाहीत.
वाहन क्षमता : २२० किलो कचरा किंवा बांधकाम मलबा वाहून नेण्याची क्षमता.
कार्यक्षमता : ४ मजूरांच्या कामाएवढी कार्यक्षमता या वाहनाची आहे.
वाहन बॅटरीवर चालणारे : एका चार्जमध्ये ६० किमी अंतर पार करण्याची क्षमता.
वाहनाला जोडलेले डब्बे : ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्बे.
वाहनातील हायड्रॉलिक अनलोडिंग प्रणाली : कचरा किंवा मलबा सहजतेने खाली करण्याची सुविधा.
बहुउपयोगी वापर : डंपर किंवा मलबा गाड्या न पोहोचू शकणाऱ्या गल्लींमधून मलबा काढण्यासाठीही

Comments
Add Comment

लालबागचा राजा नव्हे... देणगीच्या बाबतीत 'हा' गणपती मुंबईत आघाडीवर, ५ दिवसांत मिळाली १५ कोटींची देणगी

मुंबई: दरवर्षी, मुंबईतील किंग सर्कलमधील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या (जीएसबी) गणपती मंडळात पाच दिवस गणेशोत्सव

मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात! ओबीसी नेत्यांचे ठरले

न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांची तयारी मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

गोराई बीचवर भरतीच्या लाटेत बस गेली वाहून, प्रवाशांचं काय झालं पहा...

मुंबई: गोराई बीचवर सोमवारी एक थरारक घटना घडली. एक मिनीबस भरतीमुळे समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने घबराट

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब

MahaRERA : बाधित घर खरेदीदारांना दिलासा; ५,२६७ तक्रारी निकाली, भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी महारेराचे कठोर पाऊल

मुंबई: राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी मोहीम हाती

MRVC Vande Metro AC Local : मुंबईकरांनो आता गारेगार प्रवास करा! गर्दीतही आरामदायी अन् वेगवान, मुंबई लोकलमध्ये एसी डबे होणार लवकरच सुरू

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांना अधिक