मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

  30

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर


मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये कचरा उचलण्यासाठी छोट्या कॉम्पॅक्टर वाहनांची वाहतूक करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता महापालिकेच्यावतीने आता ई गाडीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयाच्यावतीने वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागातील अरुंदी गल्लीतील कचरा उचलण्यासाठी विशेष ई कचरा गाडीचा प्रयोग केला असून १५ ऑगस्ट दिनी प्रायोगिक तत्त्वावर याचा प्रारंभ करण्यात आला आहे.


एच/पूर्व विभागातील अरुंद झोपडपट्टीतील गल्लींमध्ये कचरा संकलनातील अडचणी दूर करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रयत्न केला जात असून यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-गाडीचा प्रारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ई गाडीचा प्रयोग करण्यात येत असून अंडे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करून प्रायोगिक तत्वावर याचा वापर सुरू करण्यात आला आहे.


या ई गाडीचा वापर करण्याची ही संकल्पना कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवून विभागाचा स्वच्छ व हिरवागार परिसर या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यास मदत करेल,असा विश्वास मृदुला अंडे यांनी व्यक्त केला.


वाहनाची रुंदी ३२ इंच-अशा अरुंद गल्लींमध्ये सहज प्रवेश, जिथे लहान बंदिस्त कचरा गाड्या पोहोचू शकत नाहीत.
वाहन क्षमता : २२० किलो कचरा किंवा बांधकाम मलबा वाहून नेण्याची क्षमता.
कार्यक्षमता : ४ मजूरांच्या कामाएवढी कार्यक्षमता या वाहनाची आहे.
वाहन बॅटरीवर चालणारे : एका चार्जमध्ये ६० किमी अंतर पार करण्याची क्षमता.
वाहनाला जोडलेले डब्बे : ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्बे.
वाहनातील हायड्रॉलिक अनलोडिंग प्रणाली : कचरा किंवा मलबा सहजतेने खाली करण्याची सुविधा.
बहुउपयोगी वापर : डंपर किंवा मलबा गाड्या न पोहोचू शकणाऱ्या गल्लींमधून मलबा काढण्यासाठीही

Comments
Add Comment

रिअलमी पी 4 सिरीज २० ऑगस्टला भारतात होणार लाँच

मुंबई : रिअलमी कंपनी २० ऑगस्ट २०२५ रोजी भारतात आपली नवी रिअलमी P4 स्मार्टफोन सिरीज बाजारात आणत

राज्यात मुसळधार पावसाने सहा जणांचा बळी, पुण्यासाठी रेड अलर्ट

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने थैमान घातले असून विविध दुर्घटनांत सहा जणांचा मृत्यू झाल्याची

Chintamani First Look: 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर, संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृतीने वेधले लक्ष

मुंबई: मुंबईतील मानाच्या गणपतीमधील एक असलेला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. आज सकाळी

विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका

संघाची दिल्लीत दोन दिवस बैठक

संलग्न संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार मुंबई : अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.