मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर


मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद गल्ल्यांमध्ये कचरा उचलण्यासाठी छोट्या कॉम्पॅक्टर वाहनांची वाहतूक करण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता महापालिकेच्यावतीने आता ई गाडीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयाच्यावतीने वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागातील अरुंदी गल्लीतील कचरा उचलण्यासाठी विशेष ई कचरा गाडीचा प्रयोग केला असून १५ ऑगस्ट दिनी प्रायोगिक तत्त्वावर याचा प्रारंभ करण्यात आला आहे.


एच/पूर्व विभागातील अरुंद झोपडपट्टीतील गल्लींमध्ये कचरा संकलनातील अडचणी दूर करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रयत्न केला जात असून यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-गाडीचा प्रारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ई गाडीचा प्रयोग करण्यात येत असून अंडे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करून प्रायोगिक तत्वावर याचा वापर सुरू करण्यात आला आहे.


या ई गाडीचा वापर करण्याची ही संकल्पना कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवून विभागाचा स्वच्छ व हिरवागार परिसर या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यास मदत करेल,असा विश्वास मृदुला अंडे यांनी व्यक्त केला.


वाहनाची रुंदी ३२ इंच-अशा अरुंद गल्लींमध्ये सहज प्रवेश, जिथे लहान बंदिस्त कचरा गाड्या पोहोचू शकत नाहीत.
वाहन क्षमता : २२० किलो कचरा किंवा बांधकाम मलबा वाहून नेण्याची क्षमता.
कार्यक्षमता : ४ मजूरांच्या कामाएवढी कार्यक्षमता या वाहनाची आहे.
वाहन बॅटरीवर चालणारे : एका चार्जमध्ये ६० किमी अंतर पार करण्याची क्षमता.
वाहनाला जोडलेले डब्बे : ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्बे.
वाहनातील हायड्रॉलिक अनलोडिंग प्रणाली : कचरा किंवा मलबा सहजतेने खाली करण्याची सुविधा.
बहुउपयोगी वापर : डंपर किंवा मलबा गाड्या न पोहोचू शकणाऱ्या गल्लींमधून मलबा काढण्यासाठीही

Comments
Add Comment

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

रामदास कदम यांचे दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान; 'मृत्युपत्रात सही कोणाची होती?' चौकशीची मागणी मुंबई: शिवसेनेचे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या

दक्षिण मुंबईत १०० कोटींचा घोटाळा? महापालिकेच्या 'ए-वॉर्ड'वर दक्षता विभागाची धाड!

सुशोभीकरणाच्या कामात अनियमितता; गहाळ फायली, अनावश्यक बांधकाम, आणि 'दंडा'ची वसुली मुंबई: बृहन्मुंबई