गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

  36

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार असून चाकरमानी मोठ्या संख्येने एसटीने कोकणात दाखल होणार आहे.

चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी २५०० गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. प्रवाशांना ग्रुप बुकिंगची सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.

तसेच तिकीट बुकिंगसाठी रा. प. बसस्थानकावर, खासगी एजंट यांच्यमार्फत किंवा मोबाइल ॲपद्वारे बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणपती परतीच्या वाहतुकीसाठी ११ ऑगस्टपासून आगाऊ आरक्षण सुरू झाले.

त्यामुळे बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडुप, भाईंदर या मार्गावरून आरक्षणाला प्रतिसाद मिळू लागला आहे.सर्व आगारांतून २३ ऑगस्टपासून ७ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, विरार, भांडुप, भाईंदर या मार्गावर बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी, किंग्ज सर्कल, अंधेरी, दादर तुंबलं, पोलिसांचा अलर्ट

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली असून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. एकीकडे मुंबईसह

रत्नागिरी : एसटी डेपोतच डिझेल चोरी, टँकरमध्ये छुपा कप्पा बनवून डिझेल चोरी

मंडणगडमध्ये एसटी डेपोतच डिझेल चोरीचा प्रकार समोर आला आहे. एसटी बससाठी डिझेल घेऊन आलेल्या टँकरमधूनच डिझेल चोरी

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

रत्नागिरी : लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या, राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार - नितेश राणे

रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव्ह