निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषद नेमकी कोणत्या मुद्यांवर होईल, याबाबत मात्र आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या मतदार याद्यांमधील गैरव्यवहारवर विरोधी पक्षांकडून विशेषत: राहुल गांधी आणि काँग्रेसकडून आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून उद्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांकडून दिली जात आहे.



काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी म्हटले होते की, आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून मतदार यादीतील फेरफार आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधींनी ट्विटर आणि पत्रकार परिषदांमधून थेट टीका करत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.


या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत निवडणुकीची तयारी, पारदर्शकतेसाठी उचललेली पावले आणि राहुल गांधींसह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले जाऊ शकते.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या