निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषद नेमकी कोणत्या मुद्यांवर होईल, याबाबत मात्र आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या मतदार याद्यांमधील गैरव्यवहारवर विरोधी पक्षांकडून विशेषत: राहुल गांधी आणि काँग्रेसकडून आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून उद्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांकडून दिली जात आहे.



काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी म्हटले होते की, आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून मतदार यादीतील फेरफार आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधींनी ट्विटर आणि पत्रकार परिषदांमधून थेट टीका करत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.


या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत निवडणुकीची तयारी, पारदर्शकतेसाठी उचललेली पावले आणि राहुल गांधींसह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले जाऊ शकते.

Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर