Dahi Handi 2025: मुंबईत आज दहीहंडी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात! नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : मुंबईत आज सर्वत्र दहीहंडीचा सण उत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यानुसार ठिकठिकाणी दहीहंडी आणि विशेष सभा मंडप बांधण्यात येत  आहेत.  ज्यामधील अनेक दहीहंडी विविध राजकीय नेत्यांची तसेच पक्षांची असल्याकारणामुळे, येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीच्या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचा राडा होणार नाही, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.  दरवर्षी विविध राजकीय पक्षाच्या वतीने मुंबई तसेच ठाणे परिसरात दहीहंडीचे आयोजन करून मोठी बक्षिसे ठेवण्यात येतात. मात्र यावर्षी याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असल्यामु, कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा अनुचित घटना घडू नयेयासाठी मुंबई पोलिसांनी आयोजनाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. खास करून, गर्दीमध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असून नियम मोडणारी मंडळे, आयोजकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा प्रतिमेला मज्जाव करण्यात आला आहे.



जखमी गोविंदांसाठी रुग्णालये सज्ज


यंदा जखमी गोविंदांच्या उपचारासाठी जेजे रुग्णालयामध्ये ३० खाटा राखीव असलेला स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर अस्थिव्यंग विभागामध्येही काही खाटा राखीव ठेवण्यता आल्या आहेत. तसेच अपघात विभागामध्येही सर्व वैद्यकीय सुविधा आणि औषधांची उपलब्धता ठेवण्यात आल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. त्याचप्रमाणे केईएम रुग्णालयामध्येही १५ खाटा जखमी गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद