Dahi Handi 2025: मुंबईत आज दहीहंडी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात! नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : मुंबईत आज सर्वत्र दहीहंडीचा सण उत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यानुसार ठिकठिकाणी दहीहंडी आणि विशेष सभा मंडप बांधण्यात येत  आहेत.  ज्यामधील अनेक दहीहंडी विविध राजकीय नेत्यांची तसेच पक्षांची असल्याकारणामुळे, येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीच्या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचा राडा होणार नाही, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.  दरवर्षी विविध राजकीय पक्षाच्या वतीने मुंबई तसेच ठाणे परिसरात दहीहंडीचे आयोजन करून मोठी बक्षिसे ठेवण्यात येतात. मात्र यावर्षी याचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असल्यामु, कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा अनुचित घटना घडू नयेयासाठी मुंबई पोलिसांनी आयोजनाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. खास करून, गर्दीमध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असून नियम मोडणारी मंडळे, आयोजकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा प्रतिमेला मज्जाव करण्यात आला आहे.



जखमी गोविंदांसाठी रुग्णालये सज्ज


यंदा जखमी गोविंदांच्या उपचारासाठी जेजे रुग्णालयामध्ये ३० खाटा राखीव असलेला स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर अस्थिव्यंग विभागामध्येही काही खाटा राखीव ठेवण्यता आल्या आहेत. तसेच अपघात विभागामध्येही सर्व वैद्यकीय सुविधा आणि औषधांची उपलब्धता ठेवण्यात आल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली. त्याचप्रमाणे केईएम रुग्णालयामध्येही १५ खाटा जखमी गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती

मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा