बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे विमान मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर  लँडिंग करतेवेळी अचानक अनियंत्रित झालं होते. या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला, मात्र यामुळे कोणताही मोठा अपघात झाला नाही.


समोर आलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या A321 विमान लँडिंगदरम्यान डगमगले, या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळल्याचे दिसून आले. इंडिगोने याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, खराब हवामानामुळे पायलटने लँडिंगऐवजी पुन्हा टेकऑफचा निर्णय घेतला, त्यामुळे विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे नुकसान टळले, आणि प्रवासी देखील सुखरूप राहिले.



खराब हवामानामुळे घडली ही घटना


इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, “१६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत खराब हवामान होते. त्यामुळे कमी उंचीवर उड्डाण करत असताना इंडिगो एअरबस ए३२१ या विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. मात्र विमानाने पुन्हा उड्डाण घेतले आणि ते सुरक्षितपणे उतरले. आता हे विमान पुन्हा सेवेत उतरवण्यासाठी आवश्यक तपासणी, दुरुस्ती आणि मंजुरी घ्यावी लागणार आहे.’


इंडिगोने निवेदनात पुढे असे देखील म्हटलं आहे की, ‘प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा इंडिगोचे पहिले प्राधान्य आहे. या घटनेनंतर विमान ग्राउंड करण्यात आले असून डीजीसीएला त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आता या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.'


डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आम्ही या घटनेची चौकशी करू. हे विमान 6E 1060 होते, जे बँकॉकहून मुंबईला येत होते. शनिवारी पहाटे 3:06 वाजता धावपट्टी 27 वर उतरत असताना हा किरकोळ अपघात झाला. खराब हवामानामुळे ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.



मुंबईत मुसळधार पाऊस


मुंबईत काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याकारणांमुळे मुंबईत अनेक काही दिवस पाऊसाचेच वातावरण असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बँकॉकवरुन येणाऱ्या ए३२१ इंडिगो विमानाला धावपट्टीवर उतरताना या खराब हवामानाचा सामना करावा लागला होता.


Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला