Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी बसचा भीषण अपघात झाला आहे. वृत्तानुसार, बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी होते आणि गंगा नदीत पवित्र स्नान करून परतत होते. दुर्गापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.


स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे वर्धमानहून दुर्गापूरला जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग १९ वरील नाला फेरी घाट येथे ही टक्कर झाली. मृतांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात सहा मुले जखमी झाली आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बर्दवान मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगानं जात होती. दरम्यान, चालकाला पार्क केलेला ट्रॅक्टर दिसला नव्हता. त्यामुळे बस ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोरात आदळली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

मतदान ओळखपत्र नोंदणीसाठी 'आधार' बारावा दस्तऐवज; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

नवी दिल्ली: बिहारमधील एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला

सीमेवर लावणार अत्याधुनिक रडार प्रणाली

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांनंतर, भारतीय लष्कराने उत्तरी आणि पश्चिम सीमेवर

केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्री नव्या नायरला १.१४ लाखांचा दंड!

मुंबई: लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री नव्या नायर हिला ऑस्ट्रेलियात एका साध्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

IPhone 17 Series launch : फक्त काही तास! आयफोन १७ लाँच ईव्हेंटसाठी उत्सुकता शिगेला, १७ मध्ये बरंच काही नवीन... कुठे पाहाल लाईव्ह इव्हेंट? जाणून घ्या

मुंबई : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. २०२५ मधील सर्वात मोठा स्मार्टफोन लाँच ईव्हेंट उद्या, ९ सप्टेंबर

फेसबुक आणि यूट्युब बंदी विरोधात नेपाळची तरुण पिढी रस्त्यावर, १८ जणांचा मृत्यू

काठमांडू : अफवा आणि खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात वेगाने पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जातो. हे कारण

देशद्रोही आणि नक्षलवादी पकडण्यासाठी NIA ची धडक कावाई, पाच राज्यांमध्ये धाडी

नवी दिल्ली : देशद्रोही आणि नक्षलवादी तसेच त्यांचे सहकारी पकडण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने