Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी बसचा भीषण अपघात झाला आहे. वृत्तानुसार, बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी होते आणि गंगा नदीत पवित्र स्नान करून परतत होते. दुर्गापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.


स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे वर्धमानहून दुर्गापूरला जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग १९ वरील नाला फेरी घाट येथे ही टक्कर झाली. मृतांमध्ये आठ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातात सहा मुले जखमी झाली आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली.

हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बर्दवान मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगानं जात होती. दरम्यान, चालकाला पार्क केलेला ट्रॅक्टर दिसला नव्हता. त्यामुळे बस ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोरात आदळली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

PM Modi On Trump Phone Call : ट्रम्प म्हणाले 'ट्रेड', तर मोदींनी दिले 'दहशतवादा'वर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत! फोन कॉलवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

Chhath Puja Special Railway : छठ पूजेसाठी भारतीय रेल्वे सज्ज! प्रवाशांची विक्रमी गर्दी पाहता १२०००+ विशेष गाड्या धावणार; सुरक्षेसाठी 'या' उपाययोजना

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आणि छठ पूजेच्या (Chhath Puja) सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी रेल्वे, बस किंवा विमानाने आपल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने