कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अधिक गतिमान, वेगवान होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पायाभूत, परिवहन सुविधांचा विस्तार व विकास सुरू आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) महत्वपूर्ण ठरत आहेत. वेगवान व सुरक्षित प्रवासाबरोबरच मुंबईकर नागरिकांना समुद्रकिनारी चालण्याची सोष उपलब्ध व्हावी म्हणून विहार क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. प्रशस्त पदपथ, हिरवल, सायकल ट्रॅक, तसेच दिव्यांगांसाठी व्हिलचेअर इत्यादी सुविधांयुक्त असलेला हा किनारीस रस्ता शुक्रवार मध्यरात्रीनंतर चाहतुकीसाठी २४ तास खुला केला जाणार आहे.


धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी चुमारी मार्ग यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते गुरुवारी १४ ऑगस्ट २०२५ दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. चद्रि (पूर्व) येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून हा सोहळा पार पडला.


याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्यासह गहानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.


मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह बरोबरच आता मुंबईकरांना वरळी येथे सुंदर असे विहार क्षेत्र उपलब्ध झाले असून मुंबईकरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुंबई किनारी रस्ता आता शुक्रवारी १५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्रीनंतर वाहतुकीसाठी २४ तास राहणार सुरू राहणार असल्याची त्यांनी घोषणा केली. सुंदर असा किनारी रस्ता २४ तास सुरू केल्यावर वाहनचालकांनी वाहतुकीचेच नियम पाळून चाहन चालवावे, मर्यादित वेगापेक्षा अधिकः वेगाने वाहने चालवू नयेत. आपला व इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.


Comments
Add Comment

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे