‘ऑपरेशन सिंदूर’मधील ३६ एअर वॉरियरना शौर्य पुरस्कार

  19

नवी दिल्ली: पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक व निर्णायक कारवाई करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या ३६ जवानांना केंद्र सरकारने शौर्य पुरस्कारांनी गौरवले आहे. यामध्ये ९ जणांना वीर चक्र, एकाला शौर्य चक्र व २६ जणांना वायुसेना पदक प्रदान करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.


वीर चक्र कोणाला मिळाले?
ग्रुप कॅप्टन आर. एस. सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, ग्रुप कॅप्टन अनिमेष पाटणी, ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार, स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग, स्क्वाड्रन लीडर रिजवान मलिक, फ्लाईट लेफ्टनंट ए. एस. ठाकूर या अधिकाऱ्यांनी आपल्या टीमसह पाकिस्तानातील कठोर संरक्षित भागांमध्ये अचूक बॉम्बहल्ले करून दहशतवादी नेटवर्कला धक्का दिला. एका जवानाला ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात आले आहे.


२६ वायुदल अधिकाऱ्यांना ‘वायुसेना पदक’ देण्यात आले आहे. हे पदक शांततेच्या काळात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाते. भारत सरकारने पहिल्यांदाच वायुदलाच्या अधिकाऱ्याला ‘सर्वोत्तम युद्ध सेवा पदक’ जाहीर केले आहे. हे पदक युद्ध परिस्थितीत दिलेल्या सर्वोत्कृष्ट सेवेबाबत दिले जाते.

Comments
Add Comment

जम्मू-काश्मीर : किश्तवाड ढगफुटीतील मृतांचा आकडा 65 वर

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीत मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. त्यात दोन सीआयएसएफ

एसीच्या कूलिंगबद्दल केली तक्रार ! डक्ट पॅनल उघडल्यानंतर जे समोर आलं पाहून तुम्हीही व्हाल थक्क

पाटणा : लखनऊ- बरौनी एक्सप्रेसमधील प्रवाशांनी एसीच्या कूलिंगबद्दल तक्रार केली . या तक्रारीनंतर जेव्हा टेक्निशियन

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

रोजगार योजना, सुदर्शन चक्र मिशन, जीएसटी कपात, पहिली सेमीकंडक्टर चिप, ऊर्जा स्वयंपूर्णता आणि घुसखोरीच्या मुद्यावर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून १००

पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा

भारतीय सैन्यात अग्निवीरांची संख्या वाढणार

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली चांगली कामगिरी नवी दिल्ली : केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली, तेव्हा