‘ऑपरेशन सिंदूर’मधील ३६ एअर वॉरियरना शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली: पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक व निर्णायक कारवाई करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या ३६ जवानांना केंद्र सरकारने शौर्य पुरस्कारांनी गौरवले आहे. यामध्ये ९ जणांना वीर चक्र, एकाला शौर्य चक्र व २६ जणांना वायुसेना पदक प्रदान करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.


वीर चक्र कोणाला मिळाले?
ग्रुप कॅप्टन आर. एस. सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, ग्रुप कॅप्टन अनिमेष पाटणी, ग्रुप कॅप्टन कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्रा, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार, स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग, स्क्वाड्रन लीडर रिजवान मलिक, फ्लाईट लेफ्टनंट ए. एस. ठाकूर या अधिकाऱ्यांनी आपल्या टीमसह पाकिस्तानातील कठोर संरक्षित भागांमध्ये अचूक बॉम्बहल्ले करून दहशतवादी नेटवर्कला धक्का दिला. एका जवानाला ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात आले आहे.


२६ वायुदल अधिकाऱ्यांना ‘वायुसेना पदक’ देण्यात आले आहे. हे पदक शांततेच्या काळात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाते. भारत सरकारने पहिल्यांदाच वायुदलाच्या अधिकाऱ्याला ‘सर्वोत्तम युद्ध सेवा पदक’ जाहीर केले आहे. हे पदक युद्ध परिस्थितीत दिलेल्या सर्वोत्कृष्ट सेवेबाबत दिले जाते.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी