गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

मुंबई : 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत एका नव्या गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर तब्बल २० वर्षांनी त्याने एक खास काम केले आहे, ज्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.




 

अभिजीतने पहिल्यांदाच एका मालिकेसाठी शीर्षक गीत गायले आहे. झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली तुटेना' या मालिकेसाठी त्याने हे शीर्षक गीत गायले आहे. याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, "झी मराठीसारख्या वाहिनीसाठी शीर्षक गीत गाण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या २० वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी एखाद्या मालिकेसाठी शीर्षक गीत गायलं आहे आणि तेही झी मराठीसाठी. याचा मला खूप आनंद आहे."


आपल्या गाण्याला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावर अभिजीत म्हणाला, "गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. उत्तम गाणं शब्दबद्ध करून त्याला योग्य न्याय देणं ही माझी जबाबदारी होती. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम बघून मला समाधान मिळालं आहे की माझ्याकडून नक्कीच काहीतरी चांगलं झालं आहे. 'वीण दोघांतली तुटेना'साठी गायलेलं हे गाणं माझ्या आठवणीत नक्कीच राहील."


अभिजीतच्या या शीर्षक गीताला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळेच त्याच्या आनंदात भर पडली आहे.

Comments
Add Comment

'सूर्यवंशी' फेम'या' मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन, भावाने दिली दुःखद माहिती

Ashish Warang Passed Away:   'दृश्यम', 'सूर्यवंशी', 'मर्दानी' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' सारख्या बॉलिवूडमधील अनेक सर्वोत्कृष्ट

Baaghi 4 Review : सोशल मीडियावर ‘बागी ४’ची धूम! टायगरचा तगडा कमबॅक तर संजय दत्तची खलनायकी एन्ट्री; प्रेक्षक काय म्हणाले?

टायगर श्रॉफचा बहुचर्चित ‘बागी ४’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच

राहुल देशपांडेनंतर आता 'या' अभिनेत्रीचा देखील मोडला संसार

 'संगीत देवबाभळी' नाटकातील अभिनेत्रीचा घटस्फोट Marathi Actress Shubhangi Sadavarte Divorce: प्रसिद्ध मराठी शास्त्रीय गायक राहुल

Bigg Boss 19 Update : प्रणित मोरेवर सलमानचा घणाघाती प्रहार! प्रणित मोरेला सलमान खानने दाखवला आरसा, म्हणाला... मर्यादा ओलांडलीस

मुंबई : ‘बिग बॉस १९’चा पहिला आठवडा प्रेक्षकांसाठी जबरदस्त मसालेदार ठरला आहे. घरात रोज कुठेतरी वाद, भांडणं आणि

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

Swwapnil Joshi: मिठाईऐवजी अर्धा किलो तांदूळ आणा...घरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी स्वप्नील जोशीचं आवाहन

मुंबई: आजपासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2025) धामधूम पाहायला मिळणार आहे, घराघरात आणि विविध सार्वजनिक