गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

मुंबई : 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत एका नव्या गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर तब्बल २० वर्षांनी त्याने एक खास काम केले आहे, ज्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.




 

अभिजीतने पहिल्यांदाच एका मालिकेसाठी शीर्षक गीत गायले आहे. झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली तुटेना' या मालिकेसाठी त्याने हे शीर्षक गीत गायले आहे. याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, "झी मराठीसारख्या वाहिनीसाठी शीर्षक गीत गाण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या २० वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी एखाद्या मालिकेसाठी शीर्षक गीत गायलं आहे आणि तेही झी मराठीसाठी. याचा मला खूप आनंद आहे."


आपल्या गाण्याला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावर अभिजीत म्हणाला, "गाणं प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. उत्तम गाणं शब्दबद्ध करून त्याला योग्य न्याय देणं ही माझी जबाबदारी होती. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम बघून मला समाधान मिळालं आहे की माझ्याकडून नक्कीच काहीतरी चांगलं झालं आहे. 'वीण दोघांतली तुटेना'साठी गायलेलं हे गाणं माझ्या आठवणीत नक्कीच राहील."


अभिजीतच्या या शीर्षक गीताला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळेच त्याच्या आनंदात भर पडली आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : आज विषय गंभीर! रितेश भाऊंचा 'धक्का' कोणाला बसणार? प्रोमो आला समोर!

मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' ( Bigg

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता

Savni Ravindra : गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु; 'सावनी रेकॉर्डझ्' ची घोषणा

मुंबई : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि