मुंबईत पावसाच्या जोरदार सरी, लोकल वाहतुकीवरही परिणाम


मुंबई: मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. तसेच पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.


पावसामुळे मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल काही मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.


पश्चिमेतील जोगेश्वरी, अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे, कांदिवली या ठिकाणी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, अद्याप कुठेही पाणी भरल्याचे वृत्त नाही.



काय आहे हवामान खात्याचा इशारा?


१३ ते १५ ऑगस्टदरम्यान, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

मुलुंड पश्चिम येथील पक्षीगृह बांधण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळेना...

मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या

दिवाळीनिमित्त मुंबई विमानतळावर रोषणाईची अनोखी सजावट

मुंबई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आकर्षक पद्धतीने उजळून

राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती

मुंबई : दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल

जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्हाला माहिती आहेत का? या यादीत भारत पिछाडीवर

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक उद्योगपतींनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत त्यांच्या

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले.

बोरिवलीत ट्रॅफिक पोलिसावर रिक्षाचालक का संतापला? गुन्हा दाखल

मुंबई : बोरिवली परिसरात वाहतूक नियंत्रणाचं कर्तव्य बजावत असलेल्या ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यावर एका व्यक्तीने