मुंबईत पावसाच्या जोरदार सरी, लोकल वाहतुकीवरही परिणाम

  25


मुंबई: मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. तसेच पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.


पावसामुळे मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल काही मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.


पश्चिमेतील जोगेश्वरी, अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे, कांदिवली या ठिकाणी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, अद्याप कुठेही पाणी भरल्याचे वृत्त नाही.



काय आहे हवामान खात्याचा इशारा?


१३ ते १५ ऑगस्टदरम्यान, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Shilpa Shirodkar Car Accident : बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरचा कार अपघात; बसची कारला जोरदार धडक, पोस्ट शेअर म्हणाली...

मुंबई : ‘बिग बॉस १८’मुळे (Bigg Boss 18) पुन्हा एकदा चर्चेत आलेली आणि आपल्या सौंदर्यानं नव्वदच्या दशकात गाजवलेली

Shiv Sena symbol and name dispute : मुहूर्त ठरला! शिवसेना चिन्ह वादाचा ठोक ठराव; सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख जाहीर

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि त्याच्या चिन्हावरील वादाचा प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात उभा आहे. या

मुंबई मनपा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ची धुरा नवाब मलिकांकडे

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ

चार महिने पगार नाही; सण कसे साजरे करायचे?

महापालिकेकडून जानेवारीपासून देयके मंजुरीला विलंब मुंबई : जागेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना आज मिळणार हक्काचे घर

पहिल्या टप्प्यातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण मुंबई : आशियातील नागरी

येत्या १५ ऑगस्टपर्यंत मुंबईत घरोघरी तिरंगा फडकणार, महापालिकेचे नागरिकांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन

मुंबई (खास प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त