मुंबईत पावसाच्या जोरदार सरी, लोकल वाहतुकीवरही परिणाम


मुंबई: मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. तसेच पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.


पावसामुळे मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल काही मिनिटे उशिराने सुरू आहेत. दरम्यान, या पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.


पश्चिमेतील जोगेश्वरी, अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे, कांदिवली या ठिकाणी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, अद्याप कुठेही पाणी भरल्याचे वृत्त नाही.



काय आहे हवामान खात्याचा इशारा?


१३ ते १५ ऑगस्टदरम्यान, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर मराठवाड्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच