तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंदिरात भेट दिल्यानंतर येथे मोठा तणाव निर्माण झाला. मंदिराच्या आवारात सुरक्षा रक्षक आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.


मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचे शिखर उतरवण्यास आमदार आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते थेट तुळजापूर येथे दाखल झाले. त्यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर जीर्णोद्धार कामाची पाहणी केली. त्याचवेळी, मंदिराबाहेर भाजपचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. 'मुंब्राच्या आमदाराने येथे येण्याचे काय कारण?' असा सवाल करत त्यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून आव्हाड यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.


याचवेळी, आव्हाड यांना मंदिरात सोडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनीही मंदिरात प्रवेश करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि नंतर धक्काबुक्कीही झाली. या गोंधळामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांना बराच वेळ दर्शनाच्या रांगेत थांबावे लागले.


यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीसमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. 'आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी,' अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तुळजाभवानी मंदिराचा कळस काढण्यावरून आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारामुळे मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे तणावाचे वातावरण होते.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य