तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंदिरात भेट दिल्यानंतर येथे मोठा तणाव निर्माण झाला. मंदिराच्या आवारात सुरक्षा रक्षक आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.


मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचे शिखर उतरवण्यास आमदार आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते थेट तुळजापूर येथे दाखल झाले. त्यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर जीर्णोद्धार कामाची पाहणी केली. त्याचवेळी, मंदिराबाहेर भाजपचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. 'मुंब्राच्या आमदाराने येथे येण्याचे काय कारण?' असा सवाल करत त्यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून आव्हाड यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.


याचवेळी, आव्हाड यांना मंदिरात सोडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनीही मंदिरात प्रवेश करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि नंतर धक्काबुक्कीही झाली. या गोंधळामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांना बराच वेळ दर्शनाच्या रांगेत थांबावे लागले.


यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीसमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. 'आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी,' अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तुळजाभवानी मंदिराचा कळस काढण्यावरून आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारामुळे मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे तणावाचे वातावरण होते.

Comments
Add Comment

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात

राज्यात अतिवृष्टीमुळे १४.४४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार

मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी