Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून, कोकण विभागात १ जूनपासून आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट कायम आहे. मुंबईच्या तुरळक भागांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. दिवसभरातही उत्तर मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचा या पावसामुळे खोळंबा झाला, तर दक्षिण मुंबईत मात्र पावसाने हजेरी लावली नाही.


या आठवड्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात बुधवार, १३ ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर राज्यात १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३ ऑगस्टला महामुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. १४ ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात दि. १३ आणि १४ ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई