Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार

मुंबई : पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून, कोकण विभागात १ जूनपासून आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट कायम आहे. मुंबईच्या तुरळक भागांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. दिवसभरातही उत्तर मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचा या पावसामुळे खोळंबा झाला, तर दक्षिण मुंबईत मात्र पावसाने हजेरी लावली नाही.


या आठवड्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात बुधवार, १३ ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर राज्यात १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३ ऑगस्टला महामुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. १४ ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात दि. १३ आणि १४ ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती