Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढणार

  52

मुंबई : पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून, कोकण विभागात १ जूनपासून आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट कायम आहे. मुंबईच्या तुरळक भागांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. दिवसभरातही उत्तर मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचा या पावसामुळे खोळंबा झाला, तर दक्षिण मुंबईत मात्र पावसाने हजेरी लावली नाही.


या आठवड्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या आठवड्यात बुधवार, १३ ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर राज्यात १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान विदर्भ, तसेच कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३ ऑगस्टला महामुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. १४ ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात दि. १३ आणि १४ ऑगस्टला गडचिरोली आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अॅलर्टही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बेस्टच्या उत्पन्नात वाढ, मात्र प्रवासी संख्येत घट

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसच्या साध्या व वातानुकूलित तिकीट दरात ९

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन