मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

नवी दिल्ली: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या बंदीबाबतच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जर या प्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप योग्य नाही, असे न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.


कबुतरांना खायला घालण्यावर बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला आहे. यासंदर्भात ज्यांना काही म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी उच्च न्यायालयातच अर्ज करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.


कबुतरांना खाद्य दिल्याने त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कबुतरांची विष्ठा आणि पिसे साचतात. या विष्ठेमुळे आणि पिसामुळे श्वसनाचे आजार (जसे की, अस्थमा, हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस आणि फुफ्फुसाचे फायब्रोसिस) आणि त्वचेचे रोग होण्याचा धोका असतो. कबुतरांच्या विष्ठेमुळे डिस्टोप्लाझ्मा आणि क्लॅमायडोफिलासारखे सूक्ष्मजंतू पसरतात, ज्यामुळे 'बर्ड फॅन्सियर्स लंग' (Bird Fancier's Lung) नावाचा गंभीर आजार होतो. एकदा हा आजार वाढला की त्यावर कोणताही उपचार नाही.


तसेच कबुतरांच्या विष्ठेमध्ये असलेल्या रसायनांमुळे ऐतिहासिक इमारती, पुतळे आणि इतर बांधकामांचेही नुकसान होते. यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) दादरसह मुंबईतील इतर ५१ कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिकेने दादरमधील कबुतरखान्याच्या परिसरात ताडपत्री लावून तो बंद केला होता.


दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईला जैन समाजातील काही लोक आणि काही पक्षीप्रेमींनी विरोध केला. त्यांनी या बंदीला धार्मिक भावनांशी जोडले. त्यांनी आंदोलन करून ताडपत्री काढण्याचा प्रयत्नही केला, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.


हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयानेही या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य घालण्यावर बंदी कायम ठेवली. न्यायालयाने स्पष्ट केले की नागरिकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी