‘उडता वसई-विरार’ रोखण्यासाठी जनजागृती अभियान

कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त


विरार : मीरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या नालासोपारा, वसई ,विरार परिसरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स व विविध अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हा परिसर अमली पदार्थ खरेदी विक्री करण्याचा मोठा अड्डा बनला असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता गावागावात आणि शहरात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी याबाबत पोलिस आयुक्त निकेत कौशिक याच्यासोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात
आला आहे.
मुंबई-अहमदाबाद हायवे, वसई-विरारच्या वाहतूक व वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्त कार्यालयात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी बैठक घेतली. चिंचोटी, कामण, घोडबंदर रोड आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून, येत्या आठवड्यात रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक डायवर्जन व नागरिकांना योग्य सूचना देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून, अगोदरच नोटिफिकेशनद्वारे माहिती देणे, लाईट व हेवी व्हेइकलसाठी स्वतंत्र मार्ग नियोजित करणे, तसेच मार्गक्रमणाचे योग्य नियोजन करण्याचे
ठरवण्यात आले.
वसई-विरार परिसरातील ड्रग्सची खरेदी विक्री करण्याचे व प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ड्रग्स तसेच अमली पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध सतत कारवाई होत असते. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिसांकडून कोट्यावधी रुपयाचे अमली पदार्थ व ड्रग्स जप्त करण्यात आले. तरुण पिढीचा नाश करणाऱ्या बाबीला त्वरित आळा घालणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार दुबे पंडित यांनी केल्या आहेत. १५ ऑगस्टनंतर पोलिस प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्यासोबत जनजागृती अभियान गावागावात राबवण्याबाबत या बैठकीत ठरविण्यात आले. आमदार स्नेहा दुबे पंडित, पोलिस आयुक्त निकेत कौशिक, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाविनोद शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता गीते, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे तसेच सर्व ट्राफिक पोलीस अधिकारी
उपस्थित होते.
Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे

शंभरापेक्षा अधिक जाहिरात फलकांवर कारवाई

विरार (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या जाहिरातदारांवर मागील आठवडाभरात १० गुन्हे दाखल करण्यात

शहरात दिवाळीपूर्वी खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर करडी नजर

विरार (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी