महाविद्यालयाने अधिक शुल्क घेतल्यास कारवाई होणार

  65

शुल्क नियामक प्राधिकरणाचा महाविद्यालयांना इशारा


मुंबई : विद्यार्थ्यांकडून एकापेक्षा अधिक वर्षांचे शुल्क घेऊ नये, असे शुल्क वसूल केल्याची तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयावर कठोर कारवाईचा इशारा शुल्क नियामक प्राधिकरणाने राज्यातील सर्व वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधि आणि कृषी अभ्यासक्रमाच्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना दिला आहे. जर संस्थांनी एका वर्षापेक्षा जादा शुल्क घेतले तर त्याबाबतची तक्रार पुराव्यासह प्राधिकरणाच्या fra.govmh@gmail.com या ई-मेलवर करावी, असे आवाहन प्राधिकरणाने विद्यार्थी व पालक यांना केले आहे.


महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमानुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून किती शुल्क घ्यावे, किती वर्षांचे घ्यावे याचा उल्लेख करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली, तसेच प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी घ्यावयाचे शुल्क निश्चित केलेले असते. तरीही, अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे अशा तक्रारी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे येत आहेत.


अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. शैक्षणिक वर्षात एका वर्षापेक्षा अधिक वसूल केलेले शुल्क हे कॅपीटेशन फी असल्याचे समजले जाईल आणि अशा संस्थेविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश निश्चिती झाल्यास प्राधिकरणाने ठरवलेल्या नियमानुसारच विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेण्यात यावी. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही अनामत रक्कम परत करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे, अशा सूचना प्राधिकरणाने सर्व वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधि आणि कृषी अभ्यासक्रम महाविद्यालयांच्या प्रशासनाला केली आहे.

Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाचं काय होणार ? तोडगा निघणार की... ?

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.