महाविद्यालयाने अधिक शुल्क घेतल्यास कारवाई होणार

शुल्क नियामक प्राधिकरणाचा महाविद्यालयांना इशारा


मुंबई : विद्यार्थ्यांकडून एकापेक्षा अधिक वर्षांचे शुल्क घेऊ नये, असे शुल्क वसूल केल्याची तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयावर कठोर कारवाईचा इशारा शुल्क नियामक प्राधिकरणाने राज्यातील सर्व वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधि आणि कृषी अभ्यासक्रमाच्या खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना दिला आहे. जर संस्थांनी एका वर्षापेक्षा जादा शुल्क घेतले तर त्याबाबतची तक्रार पुराव्यासह प्राधिकरणाच्या fra.govmh@gmail.com या ई-मेलवर करावी, असे आवाहन प्राधिकरणाने विद्यार्थी व पालक यांना केले आहे.


महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमानुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून किती शुल्क घ्यावे, किती वर्षांचे घ्यावे याचा उल्लेख करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली, तसेच प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांनी घ्यावयाचे शुल्क निश्चित केलेले असते. तरीही, अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे अशा तक्रारी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे येत आहेत.


अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. शैक्षणिक वर्षात एका वर्षापेक्षा अधिक वसूल केलेले शुल्क हे कॅपीटेशन फी असल्याचे समजले जाईल आणि अशा संस्थेविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश निश्चिती झाल्यास प्राधिकरणाने ठरवलेल्या नियमानुसारच विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेण्यात यावी. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही अनामत रक्कम परत करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे, अशा सूचना प्राधिकरणाने सर्व वैद्यकीय, उच्च व तंत्र शिक्षण, विधि आणि कृषी अभ्यासक्रम महाविद्यालयांच्या प्रशासनाला केली आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती