विधानसभेच्या निवडणुकीआधी घडली धक्कादायक घटना, शरद पवारांनी केला मोठा दावा

मुंबई : दिल्लीत असताना दोन जण विधानसभा निवडणुकीची ऑफर घेऊन मला भेटले. त्यांनी १६० जागा जिंकवून देण्याची हमी दिली. या दोन जणांना मी राहुल गांधींना भेटवून दिले होते. पण आता त्या दोघांचे नाव - पत्ते आणि संपर्क क्रमांक यापैकी काहीही माझ्याकडे नाही, असा धक्कादायक दावा शरद पवार यांनी केला आहे. एक पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी हा दावा केला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत दोनजण भेटले. त्यांनी राज्यात २८८ पैकी १६० जागांवर जिंकवून देण्याची हमी दिली होती. त्यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली. त्या लोकांना जे जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं.आपण या प्रकारात पडू नये, असे आम्ही ठरवले. हा आपला रस्ता नाही, लोकांचा निर्णय असेल तो आपण स्वीकारू असा आम्ही विचार केल्याचे शरद पवार म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत मनात काही शंका नाही. निवडणूक काळात अशी मोठी आश्वासनं देणारे अनेक भेटत असतात. त्याकडे मी तेव्हा दुर्लक्ष केले, असे शरद पवार म्हणाले. पण शरद पवारांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. याआधी १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री या पदावर असताना एक बॉम्ब मुसलमानांच्या वस्तीत फुटल्याचा दावा केला होता. जो खोटा असल्याचे पुढे त्यांनीच श्रीकृष्ण आयोगाच्या समोर सांगितले होते. धार्मिक संघर्ष टाळण्यासाठी खोटी माहिती दिली होती, असा बचाव त्यांनी केला होता. यामुळे यावेळी तरी पवारांचा दावा किती खरा आहे अशा स्वरुपाची चर्चा सुरू झाली आहे.

याआधी राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना तक्रार लेखी स्वरुपात द्या तातडीने चौकशी करुन योग्य ती कारवाई करू; असे निवडणूक आयोगाने सांगितले. पण राहुल गांधी यांनी लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणे टाळले. यानंतर आयोगाने वेगवेगळे मुद्दे मांडत राहुल गांधी यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन माणसं भेटल्याचा दावा केला आहे. पण या माणसांबाबत सविस्तर माहिती देणे टाळले आहे.
Comments
Add Comment

Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ

मुंबई : पश्चिम आशियातील तणाव संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याच्या

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

Iran - America War : इराणवर मोठा दबाव! ट्रम्प यांचा थेट इशारा; पुढील ३ दिवस निर्णायक

इराणवरील दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका

IPL 2026 : अंगक्रिश रघुवंशीची विकेट वादात, 'क्षेत्ररक्षणात अडथळा' म्हणजे काय?

मुंबई : आयपीएल २०२६ चा ३८ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात,

Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा एकामागोमाग एक खात्मा! लष्कर-ए-तैबाच्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी निशाणा साधला आहे. शेख युसूफ आफ्रिदी (Sheikh Yousuf

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह