विधानसभेच्या निवडणुकीआधी घडली धक्कादायक घटना, शरद पवारांनी केला मोठा दावा

मुंबई : दिल्लीत असताना दोन जण विधानसभा निवडणुकीची ऑफर घेऊन मला भेटले. त्यांनी १६० जागा जिंकवून देण्याची हमी दिली. या दोन जणांना मी राहुल गांधींना भेटवून दिले होते. पण आता त्या दोघांचे नाव - पत्ते आणि संपर्क क्रमांक यापैकी काहीही माझ्याकडे नाही, असा धक्कादायक दावा शरद पवार यांनी केला आहे. एक पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी हा दावा केला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत दोनजण भेटले. त्यांनी राज्यात २८८ पैकी १६० जागांवर जिंकवून देण्याची हमी दिली होती. त्यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली. त्या लोकांना जे जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं.आपण या प्रकारात पडू नये, असे आम्ही ठरवले. हा आपला रस्ता नाही, लोकांचा निर्णय असेल तो आपण स्वीकारू असा आम्ही विचार केल्याचे शरद पवार म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत मनात काही शंका नाही. निवडणूक काळात अशी मोठी आश्वासनं देणारे अनेक भेटत असतात. त्याकडे मी तेव्हा दुर्लक्ष केले, असे शरद पवार म्हणाले. पण शरद पवारांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. याआधी १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री या पदावर असताना एक बॉम्ब मुसलमानांच्या वस्तीत फुटल्याचा दावा केला होता. जो खोटा असल्याचे पुढे त्यांनीच श्रीकृष्ण आयोगाच्या समोर सांगितले होते. धार्मिक संघर्ष टाळण्यासाठी खोटी माहिती दिली होती, असा बचाव त्यांनी केला होता. यामुळे यावेळी तरी पवारांचा दावा किती खरा आहे अशा स्वरुपाची चर्चा सुरू झाली आहे.

याआधी राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना तक्रार लेखी स्वरुपात द्या तातडीने चौकशी करुन योग्य ती कारवाई करू; असे निवडणूक आयोगाने सांगितले. पण राहुल गांधी यांनी लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणे टाळले. यानंतर आयोगाने वेगवेगळे मुद्दे मांडत राहुल गांधी यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन माणसं भेटल्याचा दावा केला आहे. पण या माणसांबाबत सविस्तर माहिती देणे टाळले आहे.
Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये