विधानसभेच्या निवडणुकीआधी घडली धक्कादायक घटना, शरद पवारांनी केला मोठा दावा

मुंबई : दिल्लीत असताना दोन जण विधानसभा निवडणुकीची ऑफर घेऊन मला भेटले. त्यांनी १६० जागा जिंकवून देण्याची हमी दिली. या दोन जणांना मी राहुल गांधींना भेटवून दिले होते. पण आता त्या दोघांचे नाव - पत्ते आणि संपर्क क्रमांक यापैकी काहीही माझ्याकडे नाही, असा धक्कादायक दावा शरद पवार यांनी केला आहे. एक पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी हा दावा केला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत दोनजण भेटले. त्यांनी राज्यात २८८ पैकी १६० जागांवर जिंकवून देण्याची हमी दिली होती. त्यावेळी मी त्यांची गाठ राहुल गांधी यांच्याशी घालून दिली. त्या लोकांना जे जे काही बोलायचं होतं, ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं.आपण या प्रकारात पडू नये, असे आम्ही ठरवले. हा आपला रस्ता नाही, लोकांचा निर्णय असेल तो आपण स्वीकारू असा आम्ही विचार केल्याचे शरद पवार म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत मनात काही शंका नाही. निवडणूक काळात अशी मोठी आश्वासनं देणारे अनेक भेटत असतात. त्याकडे मी तेव्हा दुर्लक्ष केले, असे शरद पवार म्हणाले. पण शरद पवारांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. याआधी १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री या पदावर असताना एक बॉम्ब मुसलमानांच्या वस्तीत फुटल्याचा दावा केला होता. जो खोटा असल्याचे पुढे त्यांनीच श्रीकृष्ण आयोगाच्या समोर सांगितले होते. धार्मिक संघर्ष टाळण्यासाठी खोटी माहिती दिली होती, असा बचाव त्यांनी केला होता. यामुळे यावेळी तरी पवारांचा दावा किती खरा आहे अशा स्वरुपाची चर्चा सुरू झाली आहे.

याआधी राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना तक्रार लेखी स्वरुपात द्या तातडीने चौकशी करुन योग्य ती कारवाई करू; असे निवडणूक आयोगाने सांगितले. पण राहुल गांधी यांनी लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणे टाळले. यानंतर आयोगाने वेगवेगळे मुद्दे मांडत राहुल गांधी यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधी दोन माणसं भेटल्याचा दावा केला आहे. पण या माणसांबाबत सविस्तर माहिती देणे टाळले आहे.
Comments
Add Comment

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे