'भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं पाडली'

बंगळुरू : ऑपरेशन सिंदूर कसे करायचे यासाठी मोदी सरकारने सैन्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. सैन्याच्या सर्व दलांनी परस्पर समन्वय राखून स्वतःचे प्राधान्यक्रम निश्चित केले आणि शत्रूवर हल्ल्याची एक प्रभावी योजना आखली. ही योजना कशी असावी किंवा कशी असू नये अशा स्वरुपाचे कोणतेही बंधन सरकारने सैन्यावर घातले नव्हते. हल्ला कधी सुरू करावा आणि कधी थांबवावा याबाबतचे निर्णय सैन्याने घेतले; असे भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे कसे मोडले याची माहिती त्यांनी दिली.



भारताच्या सैन्य दलांनी परस्पर समन्वय राखून एक प्रभावी योजना राबवली आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ३०० किमी. लांबून अचूक हल्ला केला. या हल्ल्याद्वारे भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. पाकिस्तानच्या नष्ट झालेल्या विमानांमध्ये एफ १६ विमानांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी केला. भारताने कसा एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानमध्ये काय वाताहात झाली याची सविस्तर माहिती त्यांनी एका सादरीकरणाद्वारे दिली. पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ नष्ट केल्याचेही एअर चीफ मार्शल म्हणाले.

एअर चीफ मार्शल एलएम कात्रे व्याख्यानात बोलताना एपी सिंग यांनी एस - ४०० क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात पाकिस्तानची विमानं नष्ट झाल्याचे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस-टू-एअर मिसाईल सिस्टिमने अर्थात एस - ४०० ने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल अशी एकूण सहा विमानं नष्ट केली. भारताच्या सर्व क्षेपणास्त्रांनी त्यांच्या लक्ष्यावर हल्ला केला, ज्यामध्ये रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाजवळील नूर खान एअरबेसला टार्गेट करण्यात आलं होतं. भारताने सलग दुसऱ्या दिवशी स्ट्राइक करुन पाकिस्तानचे अतिरेकी तळ नष्ट केले.

भारताने ९० मिनिटांचया एअर स्ट्राईकद्वारे नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफीकी एअरबेस, पंजाबमधील मुरीद एअरबेस, सिंधमधील सुक्कुर एअरबेस, सियालकोट एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कार्दू एअरबेस, कराचीजवळील भोलारी एअरबेस, जेकबाबाद एअरबेस आणि पसरूर एअरस्ट्रिपवर हल्ला केला, असे एअर चीफ मार्शल म्हणाले.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण