Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबई महापालिकेने आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र आता न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत कबुतरखाना बंदच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कबुतरप्रेमींसाठी ही मोठी निराशा ठरली आहे, तर दुसरीकडे आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य मानला जात आहे. या प्रकरणात पुढील टप्प्यावर काय घडते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






“आरोग्य अधिक महत्त्वाचं”; कबुतरखान्यावर बंदी कायम


दादरमधील कबुतरखान्याच्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आपला स्पष्ट निर्णय दिला आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेला कबुतरखान्यावर बंदीचा आदेश कायम ठेवत सांगितलं की, “नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे.” यासोबतच कोर्टाने स्पष्ट इशारा दिला की, या आदेशाचा कोणीही अवमान करू नये. जर कोणा पक्षकाराला निकालावर हरकत असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. "आमच्या निर्णयाचा अवमान न करता, न्यायालयीन पर्याय उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा," असं ठामपणे न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालामुळे आता कबुतरखान्याच्या विरोधात असलेल्यांना दिलासा मिळाला आहे, तर समर्थकांच्या नाराजीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.




आता सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होणार?


मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता या आदेशाविरोधात पुढची पायरी सर्वोच्च न्यायालयात नेली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबुतरांना दाणापाणी देण्यास पुन्हा परवानगी मिळावी, यासाठी कबुतरखाना सुरू ठेवण्याचे समर्थक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता पुढील लढाई उच्च न्यायालयातून थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर