Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबई महापालिकेने आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र आता न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत कबुतरखाना बंदच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कबुतरप्रेमींसाठी ही मोठी निराशा ठरली आहे, तर दुसरीकडे आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य मानला जात आहे. या प्रकरणात पुढील टप्प्यावर काय घडते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






“आरोग्य अधिक महत्त्वाचं”; कबुतरखान्यावर बंदी कायम


दादरमधील कबुतरखान्याच्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आपला स्पष्ट निर्णय दिला आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेला कबुतरखान्यावर बंदीचा आदेश कायम ठेवत सांगितलं की, “नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे.” यासोबतच कोर्टाने स्पष्ट इशारा दिला की, या आदेशाचा कोणीही अवमान करू नये. जर कोणा पक्षकाराला निकालावर हरकत असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. "आमच्या निर्णयाचा अवमान न करता, न्यायालयीन पर्याय उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा," असं ठामपणे न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालामुळे आता कबुतरखान्याच्या विरोधात असलेल्यांना दिलासा मिळाला आहे, तर समर्थकांच्या नाराजीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.




आता सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होणार?


मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता या आदेशाविरोधात पुढची पायरी सर्वोच्च न्यायालयात नेली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबुतरांना दाणापाणी देण्यास पुन्हा परवानगी मिळावी, यासाठी कबुतरखाना सुरू ठेवण्याचे समर्थक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता पुढील लढाई उच्च न्यायालयातून थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार