Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबई महापालिकेने आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र आता न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत कबुतरखाना बंदच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कबुतरप्रेमींसाठी ही मोठी निराशा ठरली आहे, तर दुसरीकडे आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य मानला जात आहे. या प्रकरणात पुढील टप्प्यावर काय घडते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






“आरोग्य अधिक महत्त्वाचं”; कबुतरखान्यावर बंदी कायम


दादरमधील कबुतरखान्याच्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आपला स्पष्ट निर्णय दिला आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेला कबुतरखान्यावर बंदीचा आदेश कायम ठेवत सांगितलं की, “नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे.” यासोबतच कोर्टाने स्पष्ट इशारा दिला की, या आदेशाचा कोणीही अवमान करू नये. जर कोणा पक्षकाराला निकालावर हरकत असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. "आमच्या निर्णयाचा अवमान न करता, न्यायालयीन पर्याय उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा," असं ठामपणे न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालामुळे आता कबुतरखान्याच्या विरोधात असलेल्यांना दिलासा मिळाला आहे, तर समर्थकांच्या नाराजीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.




आता सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होणार?


मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता या आदेशाविरोधात पुढची पायरी सर्वोच्च न्यायालयात नेली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबुतरांना दाणापाणी देण्यास पुन्हा परवानगी मिळावी, यासाठी कबुतरखाना सुरू ठेवण्याचे समर्थक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता पुढील लढाई उच्च न्यायालयातून थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा