Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मुंबई महापालिकेने आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. मात्र आता न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत कबुतरखाना बंदच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कबुतरप्रेमींसाठी ही मोठी निराशा ठरली आहे, तर दुसरीकडे आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य मानला जात आहे. या प्रकरणात पुढील टप्प्यावर काय घडते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






“आरोग्य अधिक महत्त्वाचं”; कबुतरखान्यावर बंदी कायम


दादरमधील कबुतरखान्याच्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने आपला स्पष्ट निर्णय दिला आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेला कबुतरखान्यावर बंदीचा आदेश कायम ठेवत सांगितलं की, “नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे.” यासोबतच कोर्टाने स्पष्ट इशारा दिला की, या आदेशाचा कोणीही अवमान करू नये. जर कोणा पक्षकाराला निकालावर हरकत असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. "आमच्या निर्णयाचा अवमान न करता, न्यायालयीन पर्याय उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा," असं ठामपणे न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालामुळे आता कबुतरखान्याच्या विरोधात असलेल्यांना दिलासा मिळाला आहे, तर समर्थकांच्या नाराजीला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.




आता सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होणार?


मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता या आदेशाविरोधात पुढची पायरी सर्वोच्च न्यायालयात नेली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबुतरांना दाणापाणी देण्यास पुन्हा परवानगी मिळावी, यासाठी कबुतरखाना सुरू ठेवण्याचे समर्थक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता पुढील लढाई उच्च न्यायालयातून थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही