कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही लोक एका कारमध्ये बसून कॅफेच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत. याच गोल्डी ढिल्लो नावाच्या एका गँगस्टरने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून दावा केला की हल्ला गिरोहने केला आहे.


दरम्यान, या गोळीबारा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक पोलिसानी तपास सुरू केला आहे. कपिल शर्माकडून आतापर्यंत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


गोल्डी ढिल्लो स्वत:ला लाँरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगतो. फायरिंगच्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्टच्या सकाळी साधारण ४.४० वाजता न्यूटन परिसराच्या १२० स्ट्रीट स्थित व्यावसायिक परिसरात गोळ्यांचा आवाज ऐकू आला. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांना कॅफेच्या खिडक्या आणि इमारतीत गोळ्यांचे निशाण सापडले. दरम्यान, कॅफेच्या आतील स्टाफला कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. याच ठिकाणी १० जुलैलाही गोळीबाराची घटना घडली होती.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर