जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्याविरोधातील खटल्याची सुनावणी मागील पाच महिने स्थगित होती. ही सुनावणी आता पुन्हा सुरू झाली आहे. चौधरीचा सहकारी नरेंद्र परमार याची साक्ष नोंदवण्यात आली.

चौधरीवर ३१ जुलै २०२३ रोजी पहाटे या गाडीत सेवेवर असताना सर्व्हिस रायफलमधून गोळीबार करून वरिष्ठ सहकारी (सहायक उपनिरीक्षक) टिकाराम मीना यांना तसेच तीन प्रवाशांना ठार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर, आपण मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचा दावा चौधरीने वकिलांमार्फत केला होता. या प्रकरणी वैद्यकीय अहवाल आला आहे. चौधरी हा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्याविरोधातील खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले आरपीएफचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांची सहावे साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवण्यात आली.

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसच्या एस सहा या डब्यात चौधरीने गोळीबार केला. तो कोणत्या तरी कारणामुळे चिडलेला दिसत होता. त्यावेळी त्याला थांबवावे असे वाटले होते. मात्र तसा प्रयत्न केला तर तो आणखी प्रवाशांवर गोळीबार करेल, अशी भीती वाटत होती; असे आरपीएफचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल नरेंद्र परमार यांनी सांगतले.
Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी