भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील लाडक्या बहिणींच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे.


यावर्षदिखील पोस्टाने राखी पाठविण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले आहेत. शहरातील ३४ पोस्ट कार्यालयात दररोज हजारो राख्यांच्या पाकिटांचे बुकिंग होत असून, त्या पोस्टातून राख्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. पोस्टाने राखी स्पेशलचा लिफाफा सादर केला आहे. हा राखी लिफाफा वॉटरप्रूफ आहे. या लिफाफ्यातून पाठवलेली राखी न भिजता भावापर्यंत व्यवस्थित पोहोचवली जाणार आहे.


लिफाफा वॉटरप्रूफ असल्याने राखीचे पाकीट पावसातही सुरक्षित राहील. पार्सल पाठवल्यानंतर ते कुठे पोहोचले आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.


इंडियन पोस्टने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे की, लोकांना आपला लिफाफा कुठे पोहोचला आहे हे फक्त एका क्लिकवर कळू शकते. अवघ्या एका क्लिकवर पार्सलशी संबंधित सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


स्पीड पोस्ट, रजिस्टर, सामान्यतः वजनानुसार ५ रुपयाचे तिकीट लावून राखी पाठवू शकतात. ग्राहकांना जशी गरज आहे त्याप्रमाणे राखी पाठवू शकतात. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग करण्याची सुविधा आहे. रजिस्टरसाठी २२ रुपये, स्पीड पोस्ट पुण्यात १८ रुपये आणि पुण्याच्या बाहेर असेल तर ४१ रुपये आहे वजनाप्रमाणे दर बदलत राहतात. बाय एअर मेल सुविधा उपलब्ध आहे. स्पीड पोस्टने राखी पाठविली तर ट्रॅकिंगची सुविधा आहे. ( जनसंपर्क निरीक्षक, पिपरी) के. एस. पारखी,

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे