भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील लाडक्या बहिणींच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे.


यावर्षदिखील पोस्टाने राखी पाठविण्यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू केले आहेत. शहरातील ३४ पोस्ट कार्यालयात दररोज हजारो राख्यांच्या पाकिटांचे बुकिंग होत असून, त्या पोस्टातून राख्या विविध ठिकाणी पाठविल्या जातात. येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. पोस्टाने राखी स्पेशलचा लिफाफा सादर केला आहे. हा राखी लिफाफा वॉटरप्रूफ आहे. या लिफाफ्यातून पाठवलेली राखी न भिजता भावापर्यंत व्यवस्थित पोहोचवली जाणार आहे.


लिफाफा वॉटरप्रूफ असल्याने राखीचे पाकीट पावसातही सुरक्षित राहील. पार्सल पाठवल्यानंतर ते कुठे पोहोचले आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.


इंडियन पोस्टने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे की, लोकांना आपला लिफाफा कुठे पोहोचला आहे हे फक्त एका क्लिकवर कळू शकते. अवघ्या एका क्लिकवर पार्सलशी संबंधित सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


स्पीड पोस्ट, रजिस्टर, सामान्यतः वजनानुसार ५ रुपयाचे तिकीट लावून राखी पाठवू शकतात. ग्राहकांना जशी गरज आहे त्याप्रमाणे राखी पाठवू शकतात. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग करण्याची सुविधा आहे. रजिस्टरसाठी २२ रुपये, स्पीड पोस्ट पुण्यात १८ रुपये आणि पुण्याच्या बाहेर असेल तर ४१ रुपये आहे वजनाप्रमाणे दर बदलत राहतात. बाय एअर मेल सुविधा उपलब्ध आहे. स्पीड पोस्टने राखी पाठविली तर ट्रॅकिंगची सुविधा आहे. ( जनसंपर्क निरीक्षक, पिपरी) के. एस. पारखी,

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस