बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे : हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी शिवसेनेत प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने बेळगावात शिवसेना पक्ष वाढीला चालना मिळणार आहे.

पुरषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुवेल शेट्टे महाराज, मयुर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, सुषमा खरात महाराज, दिपा फडणवीस महाराज, अरविंद शिरळाकर महाराज, दादा महाराज, अजय घराडे महाराज यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असे ते म्हणाले. महाराष्ट्र हा साधुसंताचा आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन साधुंची हत्या देशाने पाहिली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, हिंदुत्वाचा पुढे घेऊन जाण्याचे काम आधात्मातून सर्व साधु संन्यासीजन करत आहेत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे वरचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार होता, मात्र आता काहीजणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. साधुसंतांचे आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया, शिवसेना संतांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराला मिळाला आधार; सरनाईक कुटुंबाकडून शेतकऱ्यांना '१०१ गोवंश' भेट!

मुंबई : यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः धाराशिव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का, उपाध्यक्षांचा आकस्मिक मृत्यू

चाळीसगाव : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख (राजू