Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवद्वारे ठार केल्यानंतर, त्यांच्याकडील काही महत्वाचे कागदपत्र भारताच्या हाती लागले आहेत. या कागदपत्रांनुसार ते पाकिस्तानी असल्याचा आणि पाकिस्तान लष्कराशी संबंधीत असल्याचे पुरावे सैन्याला मिळाले आहेत. याद्वारे पहलगाम हल्ल्याची योजना पाकिस्तानातच रचली गेली होती, आणि याचा संबंध थेट लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी सरकारी एजन्सींसोबत असल्याचे आता उघड झाले आहे.


पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. या हल्ल्याच्या तपासात भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे. पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या ३ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात भारतीय सैन्यांना यश आले खरे, पण याबरोबरच ते नेमके कुठून आणि कसे आले? याचा सुगावा देखील सैन्यांना लागला आहे.



तपासात काय उघड झाले?


पहलगाम हल्ल्यात सामील तीन दहशतवादी सुलैमान शाह उर्फ फैझल जट्ट, अबू हमजा उर्फ अफगान आणि यासिर उर्फ जिब्रान पाकिस्तान नागरिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच ते लष्कर-ए-तोयबाचे A++ आणि A कॅटगरीचे कमांडर होते. भारतीय गुप्तचर एजन्सीच्या मते हे तिघंही मे २०२२ मध्ये गुरेज सेक्टरमधून एलओसी पार करुन कश्मीर खोऱ्यात दाखल झाले होते. त्यांचे रेडिओ सिग्नल त्याचवेळी इंटरसेप्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतू नंतर हे दहशतवादी पहलगाम जवळी एका झोपडीत लपून बसले. येथे स्थानिक मदतगार परवेझ आणि बशीर अहमद जठार यांनी त्यांना शरण दिली होती.



पाकिस्तान नागरिक असलेले महत्वाचे कागदपत्र आणि साहित्य


ऑपरेशन महादेव अंतर्गत या तिघांना २८ जुलै रोजी भारतीय सैन्यांनी ठार करत मोठे यश मिळवले. यादरम्यान त्यांच्या जवळून काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यातील दोन दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी व्होटर आयडी कार्ड सापडले असून ते लाहोर आणि गुजरांवाला येथून जारी केलेले आहेत. या शिवाय त्यांच्याकडे एका सॅटेलाईट फोनमधून मायक्रो-एसडी कार्ड मिळाले आहे, त्यात NADRA चा बॉयोमेट्रीक डेटा सापडला. या डेटातून या अतिरेक्यांचे नागरिकत्व, कसूर जिल्हा, पीओके येथील कायमस्वरुपी पत्त्याची माहिती मिळाली आहे. तसेच फोरेन्सिक तपासानंतर हे देखील स्पष्ट झाले आहे की हल्ल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या त्याच AK-103 रायफलच्या  आहे, तसेच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे पाकिस्तानात तयार झालेले चॉकलेट आणि इतर खाण्या पिण्याचे सामान सापडले आहे, ज्यावर २०२४ चे मुझफ्फराबाद येथे पाठवले गेलेल्या शिपमेंटच्या लॉटचे नंबर होते.



मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकमध्ये शहिदांसारखा मानसन्मान


दरम्यान एक आणखी महत्वाची माहीती मिळाली आहे की लष्करच्या लाहोर स्थित ऑपरेशन चीफ साजिद सैफुल्लाह जट्ट या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे. तर रावळकोट निवासी रिझवान अनीस याने कश्मीरात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी गायबाना नमाज-ए-जनाजा आयोजित केला होता. थोडक्यात काय तर पाकिस्तानात या दहशतवाद्यांना शहिदांसारखा मानसन्मान मिळाला.


गृहमंत्री अमित शाह यांनी देखील संसदेत सांगितले की आमच्याकडे आता पहिल्यांदा पाकिस्तानकडून जारी केलेले सरकारी दस्तावेज आहेत. ज्यामुळे स्पष्ट होते की पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी पाकिस्तानी होते. हा डोजिएर आतापर्यंतचा सर्वात ठोस आणि निर्णायक दस्तावेज मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची अतिरेक्यांना पाठींबा देण्याची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि