काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या महिला खासदार सुधा रामकृष्णन यांनी केली. ही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

खासदार सुधा रामकृष्णन तामिळनाडू भवनमध्ये राहतात. तामिळनाडूतील मयिलादुथुराई येथील खासदार रामकृष्णन यांनी सांगितले की, चाणक्यपुरी येथील पोलिश दूतावासाजवळ त्या द्रमुकच्या त्यांच्या सहकारी खासदार राजथी यांच्यासोबत फिरत असताना सोनसाखळी चोरीची घटना घडली. या प्रकरणात खासदार सुधा रामकृष्णन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. स्कूटरवरून येणाऱ्या एका व्यक्तीने सोनसाखळी खेचली आणि वेगाने निघून गेला असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी पोलिसांना तसेच पत्राद्वारे अमित शाह यांना सांगितले आहे. चोरट्याने हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचा चेहरा दिसला नसल्याची माहिती खासदार सुधा रामकृष्णन यांनी दिली. चोरीची घटना सकाळी ६:१५ च्या सुमारास घडली. चोरटा विरुद्ध दिशेने त्यांच्या जवळ आला आणि सोनसाखळी चोरुन पळून गेला, असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी सांगितले.

चोरटा आमच्या दिशेने शांतपणे आला त्यामुळे त्याचा उद्देश चोर करणे हाच आहे, हे लक्षात आले नव्हते; असे खासदार सुधा रामकृष्णन म्हणाल्या. चोरट्याने सोनसाखळी जोरात खेचली, यामुळे मानेला दुखापत झाली आणि चुडीदार फाटला असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला