काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या महिला खासदार सुधा रामकृष्णन यांनी केली. ही तक्रार नोंदवून घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

खासदार सुधा रामकृष्णन तामिळनाडू भवनमध्ये राहतात. तामिळनाडूतील मयिलादुथुराई येथील खासदार रामकृष्णन यांनी सांगितले की, चाणक्यपुरी येथील पोलिश दूतावासाजवळ त्या द्रमुकच्या त्यांच्या सहकारी खासदार राजथी यांच्यासोबत फिरत असताना सोनसाखळी चोरीची घटना घडली. या प्रकरणात खासदार सुधा रामकृष्णन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. स्कूटरवरून येणाऱ्या एका व्यक्तीने सोनसाखळी खेचली आणि वेगाने निघून गेला असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी पोलिसांना तसेच पत्राद्वारे अमित शाह यांना सांगितले आहे. चोरट्याने हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचा चेहरा दिसला नसल्याची माहिती खासदार सुधा रामकृष्णन यांनी दिली. चोरीची घटना सकाळी ६:१५ च्या सुमारास घडली. चोरटा विरुद्ध दिशेने त्यांच्या जवळ आला आणि सोनसाखळी चोरुन पळून गेला, असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी सांगितले.

चोरटा आमच्या दिशेने शांतपणे आला त्यामुळे त्याचा उद्देश चोर करणे हाच आहे, हे लक्षात आले नव्हते; असे खासदार सुधा रामकृष्णन म्हणाल्या. चोरट्याने सोनसाखळी जोरात खेचली, यामुळे मानेला दुखापत झाली आणि चुडीदार फाटला असे खासदार सुधा रामकृष्णन यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा