Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके मॅगझिन आणि ग्रेनेडसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले असून, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.


कुलगामच्या अखल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. वेढलेल्या जंगलात आणखी २-३ दहशतवादी दडून बसल्याचा अंदाज आहे. या ऑपरेशन अंतर्गत, जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये आणखी एक दहशतवादी ठार झाला आहे. ज्याचे नाव हरीस नजीर डार (टीआरएफ) असे असल्याचे म्हंटले जात आहे. त्यानुसार, आतापर्यंत एकूण ३ दहशतवादी ठार झाले आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की इथे ५ दहशतवाद्यांची टोळी होती, ज्यामधील २ दहशतवादी अजूनही जीवंत आहे.


या भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट २०२५) जंगलात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. जंगलाच्या आडून लपलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाने सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. सुरुवातीच्या गोळीबारानंतर शुक्रवारी रात्री ही कारवाई थांबवण्यात आली. शनिवारी पुन्हा सुरू झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी आतापर्यंत ३ दहशतवाद्यांना ठार मारले आहे.



एके-४७ रायफल, ग्रेनेड आणि दारूगोळा जप्त


या कारवाईदरम्यान एके-४७ रायफल, एके मॅगझिन आणि ग्रेनेडसह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्स वर तैनात केलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. ही कारवाई सुरूच आहे. एसओजी, जम्मू आणि काश्मीर पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफ एकत्रितपणे ही कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कोलकाता : पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार १५ मार्च रोजी निवडणूक

राज्यसभेसाठी उमेदवार कसे निवडले जातात? एका जागेसाठी किती मते आवश्यक आहेत?, समजून घ्या.

नवी दिल्ली: संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त आहेत. या ३७ जागांसाठी मतदान होणार होते.

ऑस्करच्या रेड कार्पेटवर ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकने हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या

मुंबई: ९८ व्या ॲकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars 2026) लॉस एंजेलिस इथल्या 'डॉल्बी थिएटर'मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.

ओडिशात रुग्णालयाच्या ICU ला आग, एवढ्या रुग्णांचा मृत्यू

कटक : ओडिशातील कटकच्या सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली.