‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’ संस्था कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे, मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिचे पुनरागमन शक्य होणार नाही, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर पालकमंत्री आबिटकर यांनी 'वनतारा' संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘वनतारा संस्थेच्या सीईओंनी करवीर मठाच्या महास्वामींना स्पष्टपणे सांगितले आहे की, महादेवीला कोल्हापुरातून नेण्याच्या संपूर्ण प्रकरणात वनताराचा कोणताही थेट संबंध नाही. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र आहेत आणि याचा आदर करून आम्ही महादेवीला परत देण्यास तयार आहोत.’


कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य
वनतारा संस्था महादेवीला परत देण्यास तयार असली तरी, या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वनविभागाच्या परवानगी यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय महादेवीला कोल्हापुरात आणता येणार नाही, असेही आबिटकर यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ