‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’ संस्था कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे, मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिचे पुनरागमन शक्य होणार नाही, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर पालकमंत्री आबिटकर यांनी 'वनतारा' संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘वनतारा संस्थेच्या सीईओंनी करवीर मठाच्या महास्वामींना स्पष्टपणे सांगितले आहे की, महादेवीला कोल्हापुरातून नेण्याच्या संपूर्ण प्रकरणात वनताराचा कोणताही थेट संबंध नाही. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र आहेत आणि याचा आदर करून आम्ही महादेवीला परत देण्यास तयार आहोत.’


कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य
वनतारा संस्था महादेवीला परत देण्यास तयार असली तरी, या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वनविभागाच्या परवानगी यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय महादेवीला कोल्हापुरात आणता येणार नाही, असेही आबिटकर यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४