Amravati Crime: महिला पोलिसाची घरात घुसून हत्या, अमरावतीत खळबळ

अमरावती: अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इथे एका महिला पोलिसाची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. अशा घुले असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत ३८ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी आशा घुले यांची गळा दाबून हत्या करण्यात  आली आहे. आशा घुले या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. तर त्यांचे पती एसआरपीएफमध्ये कर्मचारी आहेत. या हत्येचा तपास सुरू असून डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून संशयितांवर नजर ठेवली जात आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. कारण  जिथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्याच घरी गळा दाबून हत्या केली जाते, तर तेथील सामान्य लोकं किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या

बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचे कारवाईचे आदेश

मुंबई : सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक ठोस पाऊल उचलले आहे.

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

Sakhe G Sajani : 'सखे गं साजणी'तून उलगडणार तीन मित्रांची रंजक गोष्ट; ही' तगडी स्टारकास्ट झळकणार मुख्य भूमिकेत

मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक