३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

  170

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य देव आपले नक्षत्र बदलणार आहेत, ज्यामुळे काही राशींसाठी विशेषतः शुभ काळ सुरू होईल ३ ऑगस्ट २०२५ रोजी सूर्य देव 'आश्लेषा नक्षत्रात' प्रवेश करणार आहेत, ज्यामुळे ५ भाग्यवान राशींचे नशीब फळफळणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आत्मविश्वासाचा, नेतृत्वाचा आणि सन्मानाचा कारक मानला जातो, तर आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. सूर्य आणि बुध यांच्यातील हा संबंध काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

'या' ५ भाग्यवान राशींना होणार फायदा:


१. कर्क रास :
सूर्य देव आश्लेषा नक्षत्रात तुमच्या राशीच्या लग्न भावात (पहिल्या घरात) प्रवेश करतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, व्यक्तिमत्त्व उजळून निघेल आणि नेतृत्व क्षमता विकसित होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुमची बौद्धिक आणि रचनात्मक क्षमता वाढेल.

२. मिथुन रास :
सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे मिथुन राशीच्या दुसऱ्या घरावर परिणाम होईल. यामुळे तुम्हाला मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

३. तूळ रास :
सूर्याचा प्रभाव तूळ राशीच्या १० व्या घरावर राहील, ज्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नोकरीत बढती आणि वेतनवाढीची दाट शक्यता आहे. तुमची नेतृत्व क्षमता वाढल्यामुळे सहकर्मी तुमच्यावर प्रभावित होतील.

४. वृश्चिक रास :
वृश्चिक राशीच्या नवव्या घरावर सूर्याचा प्रभाव राहील, ज्यामुळे तुमचे भाग्य उजळेल आणि आध्यात्मिक विकास होईल. लांबच्या प्रवासासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

५. मीन रास :
सूर्याचा नक्षत्र बदल मीन राशीच्या पाचव्या घरावर परिणाम करेल. यामुळे तुम्हाला रचनात्मकता, प्रेम आणि बौद्धिक कार्यांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल आणि शिक्षणात प्रगती होईल.

(टीप: ही माहिती ज्योतिषीय विश्लेषणावर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती देणे हा आहे.)
Comments
Add Comment

भिवंडी : खड्ड्याने डॉक्टरचा जीव घेतला, डॉक्टरचा जागीच मृत्यू

भिंवडी शहरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डॉक्टरचा जागीच अपघाती मृत्यू झाला आहे.

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत येणार, नाशिक, जालनामध्ये बैठकांचं सत्र

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघणार काढणार असल्याचा

अकोटमध्ये गाढवांचा अनोखा पोळा

अकोला: अकोट शहरात आज गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना,

मध्य रेल्वे मुख्य व ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत येत्या रविवारी मुख्य व ट्रान्सहार्बर उपनगरीय विभागांवर विविध