पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कसं ठार मारलं ?

श्रीनगर : पहलगाम येथे धर्म विचारुन २६ जणांची हत्या करण्यात आली होती. हे नृशंस हत्याकांड करणारे तीन दहशतवादी सुरक्षा पथकांना चकवत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लपून होते. अखेर पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करणे त्यांना भोवले. दहशतवाद्यांनी वापरलेल्या चिनी यंत्रांचे सिग्नल भारताच्या सुरक्षा यंत्रणेने पकडले. यानंतर स्थानिकांच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. दहशतवादी नेमके कुठे लपले आहेत याची जास्तीत जास्त अचूक माहिती मिळवण्यात आली. ड्रोनचा वापर करुन परिसराची आकाशातून टेहळणी करण्यात आली.

दहशतवाद्यांनी चकमक होण्याआधीच्या १७ दिवसांत दोन वेळा पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला होता. अखेर दहशतवाद्यांची नेमकी स्थिती लक्षात आल्यावर सुरक्षा पथकांनी कारवाईची तयारी सुरू केली. श्रीनगरपासून काही किमी. अंतरावर असलेल्या दाचीगामच्या जंगलातील मुलनार येथे महादेव डोंगराजवळ लिडवास हे ठिकाण आहे. याच ठिकाणी दहशतवादी लपले होते. या भागात दीर्घकाळ लपणे शक्य आहे, यामुळे लवकर त्यांचा सुगावा लागला नही. पण सिग्नलच्या मदतीने सुरक्षा पथक दहशतवाद्यांचा माग काढू शकले.घेराव घालून दहशतवाद्यांची कोंडी करण्यात आली होती. पुरते अडचणीत सापडल्याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. चकमक झाली. या चकमकीत दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांकडून सुरक्षा पथकाने मोठा शस्त्रसाठा आणि चीनी बनावटीची संपर्क यंत्रणा यांची जप्ती केली.

सीमेवर पहारा असल्यामुळे दहशतवाद्यांना परत पाकिस्तानमध्ये जाणे कठीण झाले होते. यामुळे दहशतवादी डोंगराळ भागातील जंगलात लपले होते. ते वारंवार स्वतःची जागा बदलत होते. पाकिस्तानमध्ये संपर्क करण्यासाठी त्यांच्याकडून सॅटेलाइट फोनचा वापर सुरू होता. या फोनमुळेच दहशतवाद्यांना शोधणे सुरक्षा पथकांना सोपे झाले. पण मधल्या काळात काही दिवस दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन बंद केला होता. ते कोणाशीही फोनद्वारे संपर्क करणे टाळत होते. यामुळे त्यांचा माग काढण्यास वेळ लागला. पण सुरक्षा पथकांची खात्री झाल्यावर इन्फ्रारेड ड्रोनच्या मदतीने जंगलात तपासणी करण्यात आली. उष्णतेच्या मदतीने मानवी अस्तित्वाची माहिती सांगणाऱ्या या ड्रोनने जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याची जागा शोधण्यास सुरक्षा पथकाला मोलाची मदत केली होती. स्थानिकांनी दिलेली माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर दहशतवाद्यांच्या लपण्याचे नेमके ठिकाण शोधून सुरक्षा पथकाने धडक कारवाई केली.
Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर