तोतया पोलिसाने केली महिलेची चार लाखांची फसवणूक

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात सायबर फसवणुकीची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव वापरून एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिची ४ लाखांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी स्वतःची ओळख दिल्ली पोलिसांचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. याशिवाय सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला स्वतः या प्रकरणाची चौकशी करतील असेही त्यांनी या महिलेले सांगितले . पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.


अंधेरी येथे काम करणाऱ्या महिलेला १९ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने सांगितले की तिच्या आधार कार्डचा गैरवापर करून अनेक बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि ती एका आर्थिक गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल सुरू केला ज्यामध्ये पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन पुरुषांनी स्वतःची ओळख गुन्हे शाखेचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. त्यांनी महिलेला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, सीबीआय चौकशी आणि तात्काळ अटक यासह कठोर कारवाईची धमकी दिली. यानंतर महिलेने घाबरून ४ लाख रुपये ट्रान्सफर केले.आरोपीने पुढील तपास सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला करतील असे या महिलेला सांगितले . दुसऱ्या दिवशी त्यांनी महिलेला दुसऱ्या नंबरवरून फोन केला आणि त्यादरम्यान पोलिसांच्या गणवेशातील अनेक लोक तिच्या समोर बसले होते. या प्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या