तोतया पोलिसाने केली महिलेची चार लाखांची फसवणूक

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात सायबर फसवणुकीची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव वापरून एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिची ४ लाखांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी स्वतःची ओळख दिल्ली पोलिसांचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. याशिवाय सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला स्वतः या प्रकरणाची चौकशी करतील असेही त्यांनी या महिलेले सांगितले . पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.


अंधेरी येथे काम करणाऱ्या महिलेला १९ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने सांगितले की तिच्या आधार कार्डचा गैरवापर करून अनेक बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि ती एका आर्थिक गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल सुरू केला ज्यामध्ये पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन पुरुषांनी स्वतःची ओळख गुन्हे शाखेचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. त्यांनी महिलेला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, सीबीआय चौकशी आणि तात्काळ अटक यासह कठोर कारवाईची धमकी दिली. यानंतर महिलेने घाबरून ४ लाख रुपये ट्रान्सफर केले.आरोपीने पुढील तपास सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला करतील असे या महिलेला सांगितले . दुसऱ्या दिवशी त्यांनी महिलेला दुसऱ्या नंबरवरून फोन केला आणि त्यादरम्यान पोलिसांच्या गणवेशातील अनेक लोक तिच्या समोर बसले होते. या प्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील