तोतया पोलिसाने केली महिलेची चार लाखांची फसवणूक

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात सायबर फसवणुकीची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव वापरून एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिची ४ लाखांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी स्वतःची ओळख दिल्ली पोलिसांचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. याशिवाय सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला स्वतः या प्रकरणाची चौकशी करतील असेही त्यांनी या महिलेले सांगितले . पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.


अंधेरी येथे काम करणाऱ्या महिलेला १९ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने सांगितले की तिच्या आधार कार्डचा गैरवापर करून अनेक बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि ती एका आर्थिक गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल सुरू केला ज्यामध्ये पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन पुरुषांनी स्वतःची ओळख गुन्हे शाखेचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. त्यांनी महिलेला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, सीबीआय चौकशी आणि तात्काळ अटक यासह कठोर कारवाईची धमकी दिली. यानंतर महिलेने घाबरून ४ लाख रुपये ट्रान्सफर केले.आरोपीने पुढील तपास सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला करतील असे या महिलेला सांगितले . दुसऱ्या दिवशी त्यांनी महिलेला दुसऱ्या नंबरवरून फोन केला आणि त्यादरम्यान पोलिसांच्या गणवेशातील अनेक लोक तिच्या समोर बसले होते. या प्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस