गणेशोत्सव काळात प्रवाशांवर लादलेली ३० टक्के बस भाडेवाढ रद्द

एसटी महामंडळाकडून समूह आरक्षण पुन्हा सुरू


मुंबई : एकीकडे गणपती उत्सव जवळ येत असताना गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाच्या बसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर अन्यायकारक लादलेल्या ३० टक्के बस भाडे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उलटू लागल्यानंतर ते बस भाडे कमी करण्याची नामुष्की  महामंडळावर आली होती. एसटी महामंडळाने दुसऱ्या दाराने प्रवाशांवर अन्ययाकारक वसुली लागू करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता.


या बस भाडेवाढीनुसार मुंबई ठाण्याहून कोकणात गेलेल्या बस गाडीचे तेथील नजीकच्या आगारापर्यंतचे परतीचे भाडे एसटी महामंडळ प्रवाशांकडून वसूल करणार होती. त्यामुळे एका दाराने बंद केलेली बस भाडेवाढ मागील दाराने लादली गेली असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर ही दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे त्यामुळे स्थगित करण्यात आलेले समूह आरक्षण आज गुरुवारपासून पुन्हा जोराने सुरु होणार आहे.


ही भाडेवाढ अन्यायकारक असून प्रवाशांना दुप्पट भुर्दंड देणारी होती. यापूर्वी अशी छुपी भाडेवाढ करण्यात आली नव्हती. मुंबई ठाणे पालघर परिसरातून कोकणात निरनिराळ्या गाव तालुका वाड्यांमध्ये एसटी बसचे समूह आरक्षण केले जाते यापूर्वी फक्त तेवढेच बस भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात होते मात्र कोणताही लिखित आदेश नसतानाही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने या नव्या दरवाढीनुसार भाडे लागू केले होते.


एसटी बस आपल्या नियोजित ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर जवळच्या आगारापर्यंत रिकामी बस नेताना प्रत्येक प्रवाशामागे तिकीट वसुली केली जाणार होती. ही दरवाढ काही ठिकाणी ४० रुपये तर काही गावे ही कोकणातील दुर्गम ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी थेट ९० ते १०० रुपयांपर्यंत हा भुर्दंड बसणार होता, त्यामुळे ही अन्यायकारक बस भाडे वाढ रद्द करावी अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीयप्रवासी संघाने केली होती.


या नव्या बस भाड्यामुळे सध्या समूह आरक्षणात पुन्हा बंद केले होते. ऐनवेळी या छुप्या वसुलीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून समूह आरक्षण पुन्हा सुरु होणार आहे. आतापर्यंत ४०० बसचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य