गणेशोत्सव काळात प्रवाशांवर लादलेली ३० टक्के बस भाडेवाढ रद्द

एसटी महामंडळाकडून समूह आरक्षण पुन्हा सुरू


मुंबई : एकीकडे गणपती उत्सव जवळ येत असताना गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाच्या बसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर अन्यायकारक लादलेल्या ३० टक्के बस भाडे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उलटू लागल्यानंतर ते बस भाडे कमी करण्याची नामुष्की  महामंडळावर आली होती. एसटी महामंडळाने दुसऱ्या दाराने प्रवाशांवर अन्ययाकारक वसुली लागू करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता.


या बस भाडेवाढीनुसार मुंबई ठाण्याहून कोकणात गेलेल्या बस गाडीचे तेथील नजीकच्या आगारापर्यंतचे परतीचे भाडे एसटी महामंडळ प्रवाशांकडून वसूल करणार होती. त्यामुळे एका दाराने बंद केलेली बस भाडेवाढ मागील दाराने लादली गेली असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर ही दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे त्यामुळे स्थगित करण्यात आलेले समूह आरक्षण आज गुरुवारपासून पुन्हा जोराने सुरु होणार आहे.


ही भाडेवाढ अन्यायकारक असून प्रवाशांना दुप्पट भुर्दंड देणारी होती. यापूर्वी अशी छुपी भाडेवाढ करण्यात आली नव्हती. मुंबई ठाणे पालघर परिसरातून कोकणात निरनिराळ्या गाव तालुका वाड्यांमध्ये एसटी बसचे समूह आरक्षण केले जाते यापूर्वी फक्त तेवढेच बस भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात होते मात्र कोणताही लिखित आदेश नसतानाही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने या नव्या दरवाढीनुसार भाडे लागू केले होते.


एसटी बस आपल्या नियोजित ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर जवळच्या आगारापर्यंत रिकामी बस नेताना प्रत्येक प्रवाशामागे तिकीट वसुली केली जाणार होती. ही दरवाढ काही ठिकाणी ४० रुपये तर काही गावे ही कोकणातील दुर्गम ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी थेट ९० ते १०० रुपयांपर्यंत हा भुर्दंड बसणार होता, त्यामुळे ही अन्यायकारक बस भाडे वाढ रद्द करावी अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीयप्रवासी संघाने केली होती.


या नव्या बस भाड्यामुळे सध्या समूह आरक्षणात पुन्हा बंद केले होते. ऐनवेळी या छुप्या वसुलीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून समूह आरक्षण पुन्हा सुरु होणार आहे. आतापर्यंत ४०० बसचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे