गणेशोत्सव काळात प्रवाशांवर लादलेली ३० टक्के बस भाडेवाढ रद्द

एसटी महामंडळाकडून समूह आरक्षण पुन्हा सुरू


मुंबई : एकीकडे गणपती उत्सव जवळ येत असताना गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाच्या बसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर अन्यायकारक लादलेल्या ३० टक्के बस भाडे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उलटू लागल्यानंतर ते बस भाडे कमी करण्याची नामुष्की  महामंडळावर आली होती. एसटी महामंडळाने दुसऱ्या दाराने प्रवाशांवर अन्ययाकारक वसुली लागू करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता.


या बस भाडेवाढीनुसार मुंबई ठाण्याहून कोकणात गेलेल्या बस गाडीचे तेथील नजीकच्या आगारापर्यंतचे परतीचे भाडे एसटी महामंडळ प्रवाशांकडून वसूल करणार होती. त्यामुळे एका दाराने बंद केलेली बस भाडेवाढ मागील दाराने लादली गेली असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर ही दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे त्यामुळे स्थगित करण्यात आलेले समूह आरक्षण आज गुरुवारपासून पुन्हा जोराने सुरु होणार आहे.


ही भाडेवाढ अन्यायकारक असून प्रवाशांना दुप्पट भुर्दंड देणारी होती. यापूर्वी अशी छुपी भाडेवाढ करण्यात आली नव्हती. मुंबई ठाणे पालघर परिसरातून कोकणात निरनिराळ्या गाव तालुका वाड्यांमध्ये एसटी बसचे समूह आरक्षण केले जाते यापूर्वी फक्त तेवढेच बस भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात होते मात्र कोणताही लिखित आदेश नसतानाही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने या नव्या दरवाढीनुसार भाडे लागू केले होते.


एसटी बस आपल्या नियोजित ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर जवळच्या आगारापर्यंत रिकामी बस नेताना प्रत्येक प्रवाशामागे तिकीट वसुली केली जाणार होती. ही दरवाढ काही ठिकाणी ४० रुपये तर काही गावे ही कोकणातील दुर्गम ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी थेट ९० ते १०० रुपयांपर्यंत हा भुर्दंड बसणार होता, त्यामुळे ही अन्यायकारक बस भाडे वाढ रद्द करावी अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीयप्रवासी संघाने केली होती.


या नव्या बस भाड्यामुळे सध्या समूह आरक्षणात पुन्हा बंद केले होते. ऐनवेळी या छुप्या वसुलीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून समूह आरक्षण पुन्हा सुरु होणार आहे. आतापर्यंत ४०० बसचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी