गणेशोत्सव काळात प्रवाशांवर लादलेली ३० टक्के बस भाडेवाढ रद्द

एसटी महामंडळाकडून समूह आरक्षण पुन्हा सुरू


मुंबई : एकीकडे गणपती उत्सव जवळ येत असताना गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाच्या बसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर अन्यायकारक लादलेल्या ३० टक्के बस भाडे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उलटू लागल्यानंतर ते बस भाडे कमी करण्याची नामुष्की  महामंडळावर आली होती. एसटी महामंडळाने दुसऱ्या दाराने प्रवाशांवर अन्ययाकारक वसुली लागू करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता.


या बस भाडेवाढीनुसार मुंबई ठाण्याहून कोकणात गेलेल्या बस गाडीचे तेथील नजीकच्या आगारापर्यंतचे परतीचे भाडे एसटी महामंडळ प्रवाशांकडून वसूल करणार होती. त्यामुळे एका दाराने बंद केलेली बस भाडेवाढ मागील दाराने लादली गेली असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर ही दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे त्यामुळे स्थगित करण्यात आलेले समूह आरक्षण आज गुरुवारपासून पुन्हा जोराने सुरु होणार आहे.


ही भाडेवाढ अन्यायकारक असून प्रवाशांना दुप्पट भुर्दंड देणारी होती. यापूर्वी अशी छुपी भाडेवाढ करण्यात आली नव्हती. मुंबई ठाणे पालघर परिसरातून कोकणात निरनिराळ्या गाव तालुका वाड्यांमध्ये एसटी बसचे समूह आरक्षण केले जाते यापूर्वी फक्त तेवढेच बस भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात होते मात्र कोणताही लिखित आदेश नसतानाही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने या नव्या दरवाढीनुसार भाडे लागू केले होते.


एसटी बस आपल्या नियोजित ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर जवळच्या आगारापर्यंत रिकामी बस नेताना प्रत्येक प्रवाशामागे तिकीट वसुली केली जाणार होती. ही दरवाढ काही ठिकाणी ४० रुपये तर काही गावे ही कोकणातील दुर्गम ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी थेट ९० ते १०० रुपयांपर्यंत हा भुर्दंड बसणार होता, त्यामुळे ही अन्यायकारक बस भाडे वाढ रद्द करावी अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीयप्रवासी संघाने केली होती.


या नव्या बस भाड्यामुळे सध्या समूह आरक्षणात पुन्हा बंद केले होते. ऐनवेळी या छुप्या वसुलीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून समूह आरक्षण पुन्हा सुरु होणार आहे. आतापर्यंत ४०० बसचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार