"आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट..." राम कुलकर्णी यांची विखारी टिका, रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी

  65

मुंबई: शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष महिला अघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल यांना पुण्यात रेव्ह पार्टी करतांना पोलिसांनी रंगेहात पकडल्या नंतर रोहिणी खडसे यांची पदावरून हकालपट्टी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता भाजप आणि पोलिसांवरच खडसे यांचा पक्ष आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून विखारी टीका केली.


महायुती सरकारला विरोध करायचा आणि खडसे बापलेकीला समर्थन द्यायचे म्हणून शरद पवार गटाचे व उबाठाचे नेते काहीही बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना राम कुलकर्णी यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांबरोबरच शरद पवार राष्ट्रवादी पक्षधोरणांवर देखील प्रश्न उपस्थित केले. "जयंत पाटील पायउतार झाल्यापासून पक्षात प्रमुख भुमीका बजावणारे, सत्ताधारी पक्षावर बेछूट अरोप करत मोबाईल फूटेस्तोवर ट्विट करणारे रोहित पवार यांची दातखिळी बसली का ?" असा सवाल त्यांनी केला. तर "सुप्रिया सुळे या प्रकरणात रोहिणी खडसे यांचा राजीनामा घेतील असे वाटले पण त्यांनाही सदर प्रकरणात राजकिय वास येणे योग्य नव्हे." असे देखील त्यांनी म्हंटले.



रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी


शरद पवारांच्या पक्षात काही नैतिकता असेल तर खऱ्या अर्थाने अगोदर रोहिणी खडसे यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी करत आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट , असं राजकारण चालत नसतं असे खडसावले.

Comments
Add Comment

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, 'या' मुद्यावर झाली सविस्तर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्याचे

यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार, शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच

ठाणे : शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच

Malegaon bomb blast case: जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं?: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!

मुंबई: २००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे

काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आता भाजपवासी

मुंबई : जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि तीन टर्मचे आमदार आणि सध्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी