पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार


श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे सुरक्षा पथकांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड शाह सुलेमान उर्फ हाशिम मुसा याला ठार केले. हाशिम मुसा व्यतिरिक्त अबू हमजा आणि मोहम्मद यासिर या दोन दहशतवाद्यांनाही सुरक्षा पथकाने ठार केले. श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात झालेल्या चकमकीत हाशिम मुसासह एकूण तीन दहशतवादी ठार झाले.



हाशिम मुसा हा दहशतवादी म्हणून भारतात घुसला होता. त्याच्याच नेतृत्वात दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करुन २२ एप्रिल २०२५ रोजी २६ नागरिकांची हत्या केली. धर्म विचारून नागरिकांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये एक नेपाळी नागरिक पण होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी म्हणून सक्रीय होण्याआधी हाशिम मुसा पाकिस्तानच्या सैन्यात पॅरा कमांडो होता. तो जेसीओ किंवा हवालदार या पदावर पाकिस्तानच्या सैन्यात काम करत होता. यामुळे पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या सैन्याचा हात होता, याचा मोठा पुरावाच भारताच्या हाती आला आहे.


गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे मागील काही दिवसांपासून सुरक्षा पथकाचे सदस्य पाळत ठेवून होते. अखेर पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच २८ जुलै २०२५ रोजी सुरक्षा पथकाने घेराव घालून हाशिम मुसाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा पथकाने तातडीने प्रत्युत्तर दिले. सुरक्षा पथकाच्या ठोस कारवाईत पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार झाला.


भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ही कारवाई केल्यामुळे देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक होत होते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले तरी पहलगाम येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रश्न अनुत्तरित होता. आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारच ठार झालेला यामुळे दहशतवादी विरोधी भारताच्या कारवाईला आणखी मोठे यश मिळाले आहे.


Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे