पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार


श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे सुरक्षा पथकांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड शाह सुलेमान उर्फ हाशिम मुसा याला ठार केले. हाशिम मुसा व्यतिरिक्त अबू हमजा आणि मोहम्मद यासिर या दोन दहशतवाद्यांनाही सुरक्षा पथकाने ठार केले. श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात झालेल्या चकमकीत हाशिम मुसासह एकूण तीन दहशतवादी ठार झाले.



हाशिम मुसा हा दहशतवादी म्हणून भारतात घुसला होता. त्याच्याच नेतृत्वात दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करुन २२ एप्रिल २०२५ रोजी २६ नागरिकांची हत्या केली. धर्म विचारून नागरिकांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये एक नेपाळी नागरिक पण होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी म्हणून सक्रीय होण्याआधी हाशिम मुसा पाकिस्तानच्या सैन्यात पॅरा कमांडो होता. तो जेसीओ किंवा हवालदार या पदावर पाकिस्तानच्या सैन्यात काम करत होता. यामुळे पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या सैन्याचा हात होता, याचा मोठा पुरावाच भारताच्या हाती आला आहे.


गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे मागील काही दिवसांपासून सुरक्षा पथकाचे सदस्य पाळत ठेवून होते. अखेर पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच २८ जुलै २०२५ रोजी सुरक्षा पथकाने घेराव घालून हाशिम मुसाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा पथकाने तातडीने प्रत्युत्तर दिले. सुरक्षा पथकाच्या ठोस कारवाईत पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार झाला.


भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ही कारवाई केल्यामुळे देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक होत होते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले तरी पहलगाम येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रश्न अनुत्तरित होता. आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारच ठार झालेला यामुळे दहशतवादी विरोधी भारताच्या कारवाईला आणखी मोठे यश मिळाले आहे.


Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.